शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

चाफळ विभागातील वाड्यावस्त्या अंधारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात ...

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात लोटला गेला आहे. गावच्या विहिरीत पाणी असूनदेखील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करता येईना. परिणामी ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘सहनही होईना व सांगताही येईना’ अशी काहीशी नागरिकांची अवस्था झाली आहे.

शासनाने वीजवितरण कंपनीशी चर्चा करून यावर तोडगा काढावा व वीजबिल माफ करावे, अशी मागणी सर्व गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी केली आहे. दुर्गम डोंगदऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती व त्याअंतर्गत २३ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या विभागातील एकाही ग्रामपंचायतीने विजेचे बिल भरलेले नाही. विभागातील बहुतांश ग्रामपंचायती बिल भरण्यास सक्षम नाहीत. यापूर्वी शासन साधारणत: सन २०१० च्या दरम्यान ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठा वीजबिल ५० टक्के व दिवाबत्तीचे वीजबिल १०० टक्के भरत होते. कालांतराने शासनाने यात बदल करत साधारणत: सन २०१५ च्या नंतर ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या महसुलातूनच वीजबिल भरावे, असा अध्यादेश काढला गेला. व खऱ्या अर्थाने तोव्हापासून ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या गेल्या.

दरम्यान, या वेळी वीजबिल भरले नाही तर वीजकंपनी कनेक्शन तोडेल, या भीतीने अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या कुवतीप्रमाणे जमेल तेवढे बिल भरले; परंतु सगळे बिल भरले जात नसल्याने थकीत बिलाचा आकडा आपोआप फुगत गेला. त्यामुळे आज थकीत बिलाचा आकडा लाखाच्या घरात पोहोचल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या सर्व ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने थकीत बिलापोटी बंद केले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला वीज व पाण्याविना दिवस काढावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट...

वीज कनेक्शन बंद झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावच्या महसूल कराचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बघितला तर सगळे वीजबिल तेही वेळेत भरणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र आहे. याचाही शासनाने विचार करणे गरजेचे आहे.

- अशोक पवार, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघजाईवाडी

कोट..

चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. या २२ ग्रामपंचायतींचे मिळून थकीत वीजबिल हे ५८ लाख ६९ हजार रुपये आहे. वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरल्याने नाईलाजाने वीज कनेक्शन बंद करावी लागली आहेत. ज्या ग्रामपंचायत थकीत वीजबिलाचा भरणा करणार आहे, त्यांचे वीज कनेक्शन तातडीने जोडणार आहोत.

-पी. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता