शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

चाफळ विभागातील वाड्यावस्त्या अंधारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात ...

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात लोटला गेला आहे. गावच्या विहिरीत पाणी असूनदेखील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करता येईना. परिणामी ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘सहनही होईना व सांगताही येईना’ अशी काहीशी नागरिकांची अवस्था झाली आहे.

शासनाने वीजवितरण कंपनीशी चर्चा करून यावर तोडगा काढावा व वीजबिल माफ करावे, अशी मागणी सर्व गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी केली आहे. दुर्गम डोंगदऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती व त्याअंतर्गत २३ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या विभागातील एकाही ग्रामपंचायतीने विजेचे बिल भरलेले नाही. विभागातील बहुतांश ग्रामपंचायती बिल भरण्यास सक्षम नाहीत. यापूर्वी शासन साधारणत: सन २०१० च्या दरम्यान ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठा वीजबिल ५० टक्के व दिवाबत्तीचे वीजबिल १०० टक्के भरत होते. कालांतराने शासनाने यात बदल करत साधारणत: सन २०१५ च्या नंतर ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या महसुलातूनच वीजबिल भरावे, असा अध्यादेश काढला गेला. व खऱ्या अर्थाने तोव्हापासून ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या गेल्या.

दरम्यान, या वेळी वीजबिल भरले नाही तर वीजकंपनी कनेक्शन तोडेल, या भीतीने अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या कुवतीप्रमाणे जमेल तेवढे बिल भरले; परंतु सगळे बिल भरले जात नसल्याने थकीत बिलाचा आकडा आपोआप फुगत गेला. त्यामुळे आज थकीत बिलाचा आकडा लाखाच्या घरात पोहोचल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या सर्व ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने थकीत बिलापोटी बंद केले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला वीज व पाण्याविना दिवस काढावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट...

वीज कनेक्शन बंद झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावच्या महसूल कराचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बघितला तर सगळे वीजबिल तेही वेळेत भरणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र आहे. याचाही शासनाने विचार करणे गरजेचे आहे.

- अशोक पवार, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघजाईवाडी

कोट..

चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. या २२ ग्रामपंचायतींचे मिळून थकीत वीजबिल हे ५८ लाख ६९ हजार रुपये आहे. वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरल्याने नाईलाजाने वीज कनेक्शन बंद करावी लागली आहेत. ज्या ग्रामपंचायत थकीत वीजबिलाचा भरणा करणार आहे, त्यांचे वीज कनेक्शन तातडीने जोडणार आहोत.

-पी. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता