शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

चाफळ विभागातील वाड्यावस्त्या अंधारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात ...

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात लोटला गेला आहे. गावच्या विहिरीत पाणी असूनदेखील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करता येईना. परिणामी ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘सहनही होईना व सांगताही येईना’ अशी काहीशी नागरिकांची अवस्था झाली आहे.

शासनाने वीजवितरण कंपनीशी चर्चा करून यावर तोडगा काढावा व वीजबिल माफ करावे, अशी मागणी सर्व गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी केली आहे. दुर्गम डोंगदऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती व त्याअंतर्गत २३ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या विभागातील एकाही ग्रामपंचायतीने विजेचे बिल भरलेले नाही. विभागातील बहुतांश ग्रामपंचायती बिल भरण्यास सक्षम नाहीत. यापूर्वी शासन साधारणत: सन २०१० च्या दरम्यान ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठा वीजबिल ५० टक्के व दिवाबत्तीचे वीजबिल १०० टक्के भरत होते. कालांतराने शासनाने यात बदल करत साधारणत: सन २०१५ च्या नंतर ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या महसुलातूनच वीजबिल भरावे, असा अध्यादेश काढला गेला. व खऱ्या अर्थाने तोव्हापासून ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या गेल्या.

दरम्यान, या वेळी वीजबिल भरले नाही तर वीजकंपनी कनेक्शन तोडेल, या भीतीने अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या कुवतीप्रमाणे जमेल तेवढे बिल भरले; परंतु सगळे बिल भरले जात नसल्याने थकीत बिलाचा आकडा आपोआप फुगत गेला. त्यामुळे आज थकीत बिलाचा आकडा लाखाच्या घरात पोहोचल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या सर्व ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने थकीत बिलापोटी बंद केले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला वीज व पाण्याविना दिवस काढावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट...

वीज कनेक्शन बंद झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावच्या महसूल कराचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बघितला तर सगळे वीजबिल तेही वेळेत भरणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र आहे. याचाही शासनाने विचार करणे गरजेचे आहे.

- अशोक पवार, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघजाईवाडी

कोट..

चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. या २२ ग्रामपंचायतींचे मिळून थकीत वीजबिल हे ५८ लाख ६९ हजार रुपये आहे. वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरल्याने नाईलाजाने वीज कनेक्शन बंद करावी लागली आहेत. ज्या ग्रामपंचायत थकीत वीजबिलाचा भरणा करणार आहे, त्यांचे वीज कनेक्शन तातडीने जोडणार आहोत.

-पी. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता