शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रेल्वे पुलावरील कठडा बनला धोकादायक

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

अपघाताची भीती : वर्ष होऊन गेले तरी दुरुस्ती नाही

सचिन लाड - सांगली -माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावरील लोखंडी कठडा तुटल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून हा कठडा तुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो दुरुस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सायंकाळनंतर वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहने तुटलेल्या कठड्यावरून रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गतवर्षी पुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात टाटा सुमोने रिक्षाला जोराची धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक व तीन प्रवासी असे चौघे ठार झाले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर सुमो पुलाच्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली होती. यामध्ये कठडा निखळून पडला होता. या घटनेला वर्ष होऊन गेले तरी, कठडा दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. कठडा असुरक्षित असल्याने त्यामुळे आता अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओव्हरटेक करू नये, असे फलक लावूनही पुलावर जीवघेणे ओव्हरटेक सुरूच आहेत. सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेकच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होत आहेत. रात्रीच्यावेळी वाहनधारकांच्या तोंडावर समोरच्या वाहनांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश पडल्यानंतर पुढचे काहीच दिसत नाही. यातून लक्ष विचलित होऊन वाहन तुटलेल्या कठड्यावर आदळून रेल्वे रुळावर पडू शकते. शहरामध्ये सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावर होत असते. या मार्गावरील गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने जातात. या रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय या मार्गावर असल्यामुळे वाहनांची वर्दळ मार्गावर अधिक असते. रात्रीच्यावेळी वाहनधारक अपघात करुन निघून जातात. असे प्रकार अनेकदा झाले आहेत. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशीही मागणी नागरिकांतून होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना काळजी पुलावर झालेल्या एका अपघातात चौघांचा बळी गेल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पुलाच्या मध्यभागी वाहतूक पोलिसांच्या मदतीने पांढरे पट्टे मारले होते. पुलाच्या दोन्ही बाजूस ‘ओव्हरटेक करू नये’, असे फलक लावले होते. या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय असल्यामुळे या मार्गावर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते.