शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पुलावरील कठडा बनला धोकादायक

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

अपघाताची भीती : वर्ष होऊन गेले तरी दुरुस्ती नाही

सचिन लाड - सांगली -माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावरील लोखंडी कठडा तुटल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून हा कठडा तुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो दुरुस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सायंकाळनंतर वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहने तुटलेल्या कठड्यावरून रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गतवर्षी पुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात टाटा सुमोने रिक्षाला जोराची धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक व तीन प्रवासी असे चौघे ठार झाले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर सुमो पुलाच्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली होती. यामध्ये कठडा निखळून पडला होता. या घटनेला वर्ष होऊन गेले तरी, कठडा दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. कठडा असुरक्षित असल्याने त्यामुळे आता अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओव्हरटेक करू नये, असे फलक लावूनही पुलावर जीवघेणे ओव्हरटेक सुरूच आहेत. सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेकच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होत आहेत. रात्रीच्यावेळी वाहनधारकांच्या तोंडावर समोरच्या वाहनांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश पडल्यानंतर पुढचे काहीच दिसत नाही. यातून लक्ष विचलित होऊन वाहन तुटलेल्या कठड्यावर आदळून रेल्वे रुळावर पडू शकते. शहरामध्ये सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावर होत असते. या मार्गावरील गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने जातात. या रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय या मार्गावर असल्यामुळे वाहनांची वर्दळ मार्गावर अधिक असते. रात्रीच्यावेळी वाहनधारक अपघात करुन निघून जातात. असे प्रकार अनेकदा झाले आहेत. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशीही मागणी नागरिकांतून होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना काळजी पुलावर झालेल्या एका अपघातात चौघांचा बळी गेल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पुलाच्या मध्यभागी वाहतूक पोलिसांच्या मदतीने पांढरे पट्टे मारले होते. पुलाच्या दोन्ही बाजूस ‘ओव्हरटेक करू नये’, असे फलक लावले होते. या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय असल्यामुळे या मार्गावर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते.