शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

औंध-गोपूज परिसरात नुकसान डोंगररांगा काळवंडतायत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST

औंध : औंध परिसरातील गोपूज, खबालवाडी, घाटमाथा परिसरात लागलेल्या वणव्यामुळे त्या-त्या परिसरात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाले असून, वणवा लागला ...

औंध : औंध परिसरातील गोपूज, खबालवाडी, घाटमाथा परिसरात लागलेल्या वणव्यामुळे त्या-त्या परिसरात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाले असून, वणवा लागला की लावला, याविषयी चर्चा सुरू असून, असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे.

औंध आणि परिसरातील डोंगररांगा एक निसर्गाची देण असलेला परिसर असून पर्यटक, वाहनधारक, भाविक-भक्तांना आपल्या सौंदर्याने वेधून घेत असतात. या लागलेल्या वणव्यात अनेक छोटे-मोठे जीवजंतू, प्राणी, कीटक, पक्ष्यांचा नाहक बळी गेला असून, याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन लाखो झाडे, बियांचे रोपण केले. त्यानंतर त्या झाडांचे रक्षण व्हावे म्हणून पिंजरा, कापड लावण्यात आले. त्यापैकीच काही झाडे या परिसरात जोर धरू लागत असतानाच लागलेल्या या वणव्यामुळे नव्या व जुन्या झाडांना आगीची झळ लागल्याने झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जीवजंतूही होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. समाजविरोधी, निसर्गविरोधी काम करणाऱ्या समाजकंटकाना वेळीच आवर घालून त्यांच्यावर ठोस कारवाईची मागणी होत आहे.

चौकट:

यंदाची झळ बांधापर्यंत

मागील दोन दिवसांपूर्वी गोपूज येथे लागलेल्या वणव्याची आग डोंगरावरून अगदी खाली शेती असणाऱ्या हातातोंडाशी आलेल्या ज्वारी पिकापर्यंत येऊन पोहोचल्याने शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला होता.

०५गोपूज

फोटो: गोपूज (ता. खटाव) नजीकच्या डोंगररांगा मागील दोन दिवसांपूर्वी काळवंडून गेल्या आहेत. (छाया : रशीद शेख)