शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला; पण कोरड पडणार घशाला!

By admin | Updated: November 2, 2014 23:32 IST

वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा रिकामा : पाणीसाठ्याने गाठला तळ, भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा पूर्णपणे उघडा आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळीने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, काही दिवसांतच विभागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. धरणाचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्यात यावा, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत़युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले़ ‘आधी पुनर्वसन मग धरण’ असे धोरण युती शासनाने राबविले. त्यामुळे रेठरेकरवाडी, यादववाडी या गावांचे पुनर्वसन त्यावेळी योग्य पद्धतीने झाले़ पुढे १९९९ मध्ये युती शासनाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या़ त्यानंतर धरणाच्या कामांना कधी गती प्राप्त झालीच नाही़ गत दोन वर्षांपूर्वी घळभरणीचे काम पूर्ण करून धरण व्यवस्थापनाने वांग-मराठवाडी जलाशयात ०़६० टीएमसी एवढा पाणीसाठा करण्यास सुरुवात केली होती़ मात्र, त्यानंतर वांग-मराठवाडी कृती समितीने सलग सात दिवस मोठे आंदोलन करून शासनाला धरणाचे पाणी सोडून देण्यास भाग पाडले़धरणग्रस्तांनी केलेले आंदोलन योग्यच होते, कारण त्यांच्या त्यागातूनच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संसार फुलणार होते. मात्र, ज्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीला चार एकराचे स्लॅब लावून जमिनी काढून घेतल्या, त्या शेतकऱ्यांना गेली पंधरा वर्षांपासून पाणी मिळत नसेल तर त्या धरणाचा उपयोग काय ? असा सूर लाभक्षेत्रतील शेतकऱ्यांच्या मधून उमटू लागला. गतवर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी आमच्या शेतीला पाणी द्या; अन्यथा आमच्या काढून घेतलेल्या जमिनी परत करा, अशी भूमिका घेतली होती़ त्यामुळे शासनाने उन्हाळा चालू होण्याच्या अगोदर पाणी साठवण्यास सुरुवात केली होती़ परिणामी, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता़सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र, तरीही धरणाचे गेट पूर्ण खुले आहे़ त्यामुळे जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे़ पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत अडकला आहे़ धरणाचे गेट बंद करा आणि जलाशयामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात करा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)पंधरा वर्षांपासून काम सुरूचवांग-मराठवाडी धरणाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. या धरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने काम आटोपण्यात आले. मात्र, हळूहळू कामाचा वेग मंदावला. कधी निधीचा तुटवडा तर कधी तांत्रिक कारणास्तव काम बंद ठेवण्यात आले. अशातच धरणग्रस्तांनीही आपल्या न्याय हक्कांसाठी वारंवार आंदोलने केली. धरणाचे काम बंद पाडले. त्यामुळे पंधरा वर्षांपासून काम सुरू असूनही अद्याप धरण पूर्ण झालेले नाही.