शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

धरण उशाला; पण कोरड पडणार घशाला!

By admin | Updated: November 2, 2014 23:32 IST

वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा रिकामा : पाणीसाठ्याने गाठला तळ, भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा पूर्णपणे उघडा आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळीने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, काही दिवसांतच विभागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. धरणाचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्यात यावा, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत़युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले़ ‘आधी पुनर्वसन मग धरण’ असे धोरण युती शासनाने राबविले. त्यामुळे रेठरेकरवाडी, यादववाडी या गावांचे पुनर्वसन त्यावेळी योग्य पद्धतीने झाले़ पुढे १९९९ मध्ये युती शासनाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या़ त्यानंतर धरणाच्या कामांना कधी गती प्राप्त झालीच नाही़ गत दोन वर्षांपूर्वी घळभरणीचे काम पूर्ण करून धरण व्यवस्थापनाने वांग-मराठवाडी जलाशयात ०़६० टीएमसी एवढा पाणीसाठा करण्यास सुरुवात केली होती़ मात्र, त्यानंतर वांग-मराठवाडी कृती समितीने सलग सात दिवस मोठे आंदोलन करून शासनाला धरणाचे पाणी सोडून देण्यास भाग पाडले़धरणग्रस्तांनी केलेले आंदोलन योग्यच होते, कारण त्यांच्या त्यागातूनच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संसार फुलणार होते. मात्र, ज्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीला चार एकराचे स्लॅब लावून जमिनी काढून घेतल्या, त्या शेतकऱ्यांना गेली पंधरा वर्षांपासून पाणी मिळत नसेल तर त्या धरणाचा उपयोग काय ? असा सूर लाभक्षेत्रतील शेतकऱ्यांच्या मधून उमटू लागला. गतवर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी आमच्या शेतीला पाणी द्या; अन्यथा आमच्या काढून घेतलेल्या जमिनी परत करा, अशी भूमिका घेतली होती़ त्यामुळे शासनाने उन्हाळा चालू होण्याच्या अगोदर पाणी साठवण्यास सुरुवात केली होती़ परिणामी, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता़सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र, तरीही धरणाचे गेट पूर्ण खुले आहे़ त्यामुळे जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे़ पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत अडकला आहे़ धरणाचे गेट बंद करा आणि जलाशयामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात करा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)पंधरा वर्षांपासून काम सुरूचवांग-मराठवाडी धरणाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. या धरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने काम आटोपण्यात आले. मात्र, हळूहळू कामाचा वेग मंदावला. कधी निधीचा तुटवडा तर कधी तांत्रिक कारणास्तव काम बंद ठेवण्यात आले. अशातच धरणग्रस्तांनीही आपल्या न्याय हक्कांसाठी वारंवार आंदोलने केली. धरणाचे काम बंद पाडले. त्यामुळे पंधरा वर्षांपासून काम सुरू असूनही अद्याप धरण पूर्ण झालेले नाही.