शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सायबर लॅबमुळे गुन्हेगारीवरच वचक

By admin | Updated: August 16, 2016 23:33 IST

सुभाष देशमुख : सांगलीत फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन

सांगली : गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी सायबर लॅब आणि फिरती न्यायवैद्यक प्रयोगशाळा निश्चितच उपयोगी पडणार आहे, असे मत सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा पोलिस दलाच्या सायबर लॅब आणि फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन देशमुख यांच्याहस्ते सोमवारी झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, सहाय्यक पोलिस निरीक्षक व सायबर सेलचे अंजीर जाधव उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, पोलिस प्रशासनाने चांगले काम करून राष्ट्राच्या व जनतेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहून आपला नावलौकिक वाढवावा. चांगल्या गोष्टींचे अनुकरण उशिरा होते. याउलट वाईट गोष्टींचे अनुकरण लवकर केले जाते. त्यामुळे गुन्हे का घडतात आणि ते घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांचे प्रबोधन करावे. वाईट गोष्टी आणि गुन्ह्यांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करावी. राष्ट्रप्रेमाची भावना रुजविल्यास अवैध व्यवसाय व गुन्हेगारी कमी होतील. (प्रतिनिधी)पोलिसांच्या घरांचा प्रस्ताव : सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत म्हणाले की, पोलिस खात्याला सायबर लॅब व अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज आहे. पोलिसांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. ते स्वत:चे कौटुंबिक आयुष्य विसरून सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. सामान्य माणसाला न्याय मिळेल, अशी प्रतिमा पोलिस दलाने जपली आहे. त्यामुळे आपण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात पोलिसांसाठी दोन हजार घरांचा प्रस्ताव पाठविला असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.