शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

कावळा बसायला अन् फांदी तुटायला...

By admin | Updated: September 9, 2014 23:44 IST

डॉल्बी चर्चेत : इमारत जीर्ण झाल्यानेच घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत

सातारा : राजपथावर घडलेली दुर्घटना हा डॉल्बीच्या आवाजाने झाला नसून भिंत जीर्ण असल्यामुळे झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, डॉल्बीमुळेच ही घटना घडल्याचे छातीठोकपणे सांगणारेही असून, सामाजिक संस्था आणि काही मंडळांनीही डॉल्बीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.ही घटना घडली त्यावेळी येथील व्यावसायिक संतोष पोळ आपल्या काही मित्रांसह विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते. एका मंडळाचा गणपती देवी चौकात होता तर दुसऱ्या मंडळाचा गणपती खण आळीच्या तोंडावर होता असे पोळ यांचे म्हणणे आहे. या दोन्ही मंडळांच्या पुढे डॉल्बी वाजत होता. पण ते अंतर बरेच असल्याने इतक्या लांबच्या अंतराचा आणि डॉल्बीच्या आवाजाने भिंत पडल्याचा काही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.या इमारतीचा धोकादायक इमारतींमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही इमारत पाडण्याचे प्राथमिक काम सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. वास्तविक, कोणतेही बांधकाम पाडायचे असेल तर त्या इमारतीभोवती पत्रा लावून ते सुरक्षित केले जाते. ही इमारत पाडण्यापूर्वी संबंधित घरमालकांनी ही काळजी घेतली नव्हती. बोले यांची वडापावची गाडी नेहमी भिंतीला चिटकून रस्त्याच्या बाजूलाच असायची. विसर्जन मिरवुणकीत नागरिकांना अडथळा नको म्हणून त्यांनी त्यांची गाडी आतील बोळात लावल्याचेही काही व्यावसायिकांनी सांगितले. एकंदरीत या दुर्घटनेस डॉल्बी आणि अन्य बाबी किती जबाबदार याविषयी चर्चा सुरू असली, तरी ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला...’ या उक्तीनुसार दुर्घटनेचे एक कारण म्हणून डॉल्बी चर्चेत आली आहे. (प्रतिनिधी)