शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कावळा बसायला अन् फांदी तुटायला...

By admin | Updated: September 9, 2014 23:44 IST

डॉल्बी चर्चेत : इमारत जीर्ण झाल्यानेच घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत

सातारा : राजपथावर घडलेली दुर्घटना हा डॉल्बीच्या आवाजाने झाला नसून भिंत जीर्ण असल्यामुळे झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, डॉल्बीमुळेच ही घटना घडल्याचे छातीठोकपणे सांगणारेही असून, सामाजिक संस्था आणि काही मंडळांनीही डॉल्बीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.ही घटना घडली त्यावेळी येथील व्यावसायिक संतोष पोळ आपल्या काही मित्रांसह विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते. एका मंडळाचा गणपती देवी चौकात होता तर दुसऱ्या मंडळाचा गणपती खण आळीच्या तोंडावर होता असे पोळ यांचे म्हणणे आहे. या दोन्ही मंडळांच्या पुढे डॉल्बी वाजत होता. पण ते अंतर बरेच असल्याने इतक्या लांबच्या अंतराचा आणि डॉल्बीच्या आवाजाने भिंत पडल्याचा काही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.या इमारतीचा धोकादायक इमारतींमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही इमारत पाडण्याचे प्राथमिक काम सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. वास्तविक, कोणतेही बांधकाम पाडायचे असेल तर त्या इमारतीभोवती पत्रा लावून ते सुरक्षित केले जाते. ही इमारत पाडण्यापूर्वी संबंधित घरमालकांनी ही काळजी घेतली नव्हती. बोले यांची वडापावची गाडी नेहमी भिंतीला चिटकून रस्त्याच्या बाजूलाच असायची. विसर्जन मिरवुणकीत नागरिकांना अडथळा नको म्हणून त्यांनी त्यांची गाडी आतील बोळात लावल्याचेही काही व्यावसायिकांनी सांगितले. एकंदरीत या दुर्घटनेस डॉल्बी आणि अन्य बाबी किती जबाबदार याविषयी चर्चा सुरू असली, तरी ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला...’ या उक्तीनुसार दुर्घटनेचे एक कारण म्हणून डॉल्बी चर्चेत आली आहे. (प्रतिनिधी)