शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; जिल्ह्यात तीन महिन्यांत घरातच ९ मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली असून तेथेही बेड शिल्लक नाही. त्यामुळे नाइलाजास्तव अनेक बाधितांना घरातच उपचार करावे लागत आहेत. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर उपचार न मिळाल्यामुळे घरातच ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी जास्त असू शकते, मात्र प्रशासनाकडे याची आकडेवारी नसल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर अशी आहे. पाहता पाहता सर्व हॉस्पिटल हाउसफुल्ल झाली. बेड, ऑक्सिजन रुग्णांना मिळत नाहीत. त्यामुळे अनेक बाधित रुग्णांनी घरामध्येच उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना चाचणी करताना संबंधितांकडून पत्ता आणि मोबाइल नंबर रुग्णालय प्रशासनाकडून घेतला जातो. त्या वेळी अनेक जण चुकीचा मोबाइल नंबर आणि पत्ता देत असल्यामुळे पुढे बाधित रुग्णांचे काय झाले, हे प्रशासनाला समजत नाही. अशा अनेक जणांचा घरांमध्ये उपचार घेत असताना गंभीर अवस्थेत त्यांचा मृत्यू झाल्याचेही पुढे येत आहे. परंतु प्रशासनाकडे हीच आकडेवारी नाही. घरात उपचार करूनही अनेक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मात्र घरामध्ये वयस्कर लोकांनी उपचार घेणे धोक्याचे असते. परंतु असे असतानाही अनेक जण हा धोका पत्करत आहेत. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयात बेड मिळत नाहीत.

गत तीन महिन्‍यांत जिल्ह्यामध्ये ९ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर या बाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे घरात उपचार करून कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. हे प्रशासनासाठी मोठा दिलासा ठरत आहे. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या लोकांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधतेय. मात्र चुकीचे मोबाइल नंबर दिल्यामुळे प्रशासनाला लोकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे मृतांची आकडेवारी याहून जास्त असू शकते.

चौकट : होम क्वारंटाइनमध्ये सर्वाधिक रुग्ण

जिल्ह्यात सध्या १६ हजार कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करणे शक्य नाही. त्यामुळे यातील अनेक जण होम आयसोलेशनमध्ये दाखल असल्याचे प्रशासन सांगत आहे. असा हा आकडा तब्बल आठ हजारांहून अधिक आहे. या रुग्णांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधत आहे. परंतु चुकीचे नंबर असल्यामुळे त्यांचे काहीही संपर्क होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना घरी जाऊन औषधोपचार केले जात आहेत.

चौकटः एक टक्का मृत्यू घरातच

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रुग्ण अचानक प्रकृती बिघडल्यानंतर दगावत आहेत. असे प्रमाण जिल्ह्यात सध्या १ टक्का असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. होम आयसोलेशनमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या यापुढे आणखी वाढेल, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

चौकट ः कारणे काय?

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असणारे रुग्ण बरेचदा औषधे वेळेवर घेत नाहीत. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यानंतर अचानक परिस्थिती उद्भवल्यानंतर अशा लोकांची प्रकृती गंभीर बनत आहे. आजार अंगावर काढणे, हे एक प्रमुख कारण असल्यामुळे गृह विलगीकरणातील लोक दगावत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोट ः

होम आयसोलेशनमध्ये अनेक जण उपचार घेतात. या रुग्णांनी घराच्या बाहेर पडू नये. विश्रांती आणि योग्य आहार, औषधे वेळेवर घेतल्यास नक्कीच रुग्ण घरामध्येच बरे होऊ शकतात.

- डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चौकट : एकूण रुग्ण ८७९५८

बरे झालेले रुग्ण ७०६००

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १६७७६

गृह विलगीकरणातील रुग्ण ८९३०