शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; जिल्ह्यात तीन महिन्यांत घरातच ९ मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली असून तेथेही बेड शिल्लक नाही. त्यामुळे नाइलाजास्तव अनेक बाधितांना घरातच उपचार करावे लागत आहेत. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर उपचार न मिळाल्यामुळे घरातच ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी जास्त असू शकते, मात्र प्रशासनाकडे याची आकडेवारी नसल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर अशी आहे. पाहता पाहता सर्व हॉस्पिटल हाउसफुल्ल झाली. बेड, ऑक्सिजन रुग्णांना मिळत नाहीत. त्यामुळे अनेक बाधित रुग्णांनी घरामध्येच उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना चाचणी करताना संबंधितांकडून पत्ता आणि मोबाइल नंबर रुग्णालय प्रशासनाकडून घेतला जातो. त्या वेळी अनेक जण चुकीचा मोबाइल नंबर आणि पत्ता देत असल्यामुळे पुढे बाधित रुग्णांचे काय झाले, हे प्रशासनाला समजत नाही. अशा अनेक जणांचा घरांमध्ये उपचार घेत असताना गंभीर अवस्थेत त्यांचा मृत्यू झाल्याचेही पुढे येत आहे. परंतु प्रशासनाकडे हीच आकडेवारी नाही. घरात उपचार करूनही अनेक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मात्र घरामध्ये वयस्कर लोकांनी उपचार घेणे धोक्याचे असते. परंतु असे असतानाही अनेक जण हा धोका पत्करत आहेत. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयात बेड मिळत नाहीत.

गत तीन महिन्‍यांत जिल्ह्यामध्ये ९ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर या बाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे घरात उपचार करून कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. हे प्रशासनासाठी मोठा दिलासा ठरत आहे. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या लोकांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधतेय. मात्र चुकीचे मोबाइल नंबर दिल्यामुळे प्रशासनाला लोकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे मृतांची आकडेवारी याहून जास्त असू शकते.

चौकट : होम क्वारंटाइनमध्ये सर्वाधिक रुग्ण

जिल्ह्यात सध्या १६ हजार कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करणे शक्य नाही. त्यामुळे यातील अनेक जण होम आयसोलेशनमध्ये दाखल असल्याचे प्रशासन सांगत आहे. असा हा आकडा तब्बल आठ हजारांहून अधिक आहे. या रुग्णांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधत आहे. परंतु चुकीचे नंबर असल्यामुळे त्यांचे काहीही संपर्क होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना घरी जाऊन औषधोपचार केले जात आहेत.

चौकटः एक टक्का मृत्यू घरातच

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रुग्ण अचानक प्रकृती बिघडल्यानंतर दगावत आहेत. असे प्रमाण जिल्ह्यात सध्या १ टक्का असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. होम आयसोलेशनमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या यापुढे आणखी वाढेल, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

चौकट ः कारणे काय?

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असणारे रुग्ण बरेचदा औषधे वेळेवर घेत नाहीत. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यानंतर अचानक परिस्थिती उद्भवल्यानंतर अशा लोकांची प्रकृती गंभीर बनत आहे. आजार अंगावर काढणे, हे एक प्रमुख कारण असल्यामुळे गृह विलगीकरणातील लोक दगावत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोट ः

होम आयसोलेशनमध्ये अनेक जण उपचार घेतात. या रुग्णांनी घराच्या बाहेर पडू नये. विश्रांती आणि योग्य आहार, औषधे वेळेवर घेतल्यास नक्कीच रुग्ण घरामध्येच बरे होऊ शकतात.

- डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चौकट : एकूण रुग्ण ८७९५८

बरे झालेले रुग्ण ७०६००

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १६७७६

गृह विलगीकरणातील रुग्ण ८९३०