शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; जिल्ह्यात तीन महिन्यांत घरातच ९ मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली असून तेथेही बेड शिल्लक नाही. त्यामुळे नाइलाजास्तव अनेक बाधितांना घरातच उपचार करावे लागत आहेत. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर उपचार न मिळाल्यामुळे घरातच ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी जास्त असू शकते, मात्र प्रशासनाकडे याची आकडेवारी नसल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर अशी आहे. पाहता पाहता सर्व हॉस्पिटल हाउसफुल्ल झाली. बेड, ऑक्सिजन रुग्णांना मिळत नाहीत. त्यामुळे अनेक बाधित रुग्णांनी घरामध्येच उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना चाचणी करताना संबंधितांकडून पत्ता आणि मोबाइल नंबर रुग्णालय प्रशासनाकडून घेतला जातो. त्या वेळी अनेक जण चुकीचा मोबाइल नंबर आणि पत्ता देत असल्यामुळे पुढे बाधित रुग्णांचे काय झाले, हे प्रशासनाला समजत नाही. अशा अनेक जणांचा घरांमध्ये उपचार घेत असताना गंभीर अवस्थेत त्यांचा मृत्यू झाल्याचेही पुढे येत आहे. परंतु प्रशासनाकडे हीच आकडेवारी नाही. घरात उपचार करूनही अनेक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मात्र घरामध्ये वयस्कर लोकांनी उपचार घेणे धोक्याचे असते. परंतु असे असतानाही अनेक जण हा धोका पत्करत आहेत. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयात बेड मिळत नाहीत.

गत तीन महिन्‍यांत जिल्ह्यामध्ये ९ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर या बाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे घरात उपचार करून कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. हे प्रशासनासाठी मोठा दिलासा ठरत आहे. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या लोकांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधतेय. मात्र चुकीचे मोबाइल नंबर दिल्यामुळे प्रशासनाला लोकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे मृतांची आकडेवारी याहून जास्त असू शकते.

चौकट : होम क्वारंटाइनमध्ये सर्वाधिक रुग्ण

जिल्ह्यात सध्या १६ हजार कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करणे शक्य नाही. त्यामुळे यातील अनेक जण होम आयसोलेशनमध्ये दाखल असल्याचे प्रशासन सांगत आहे. असा हा आकडा तब्बल आठ हजारांहून अधिक आहे. या रुग्णांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधत आहे. परंतु चुकीचे नंबर असल्यामुळे त्यांचे काहीही संपर्क होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना घरी जाऊन औषधोपचार केले जात आहेत.

चौकटः एक टक्का मृत्यू घरातच

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रुग्ण अचानक प्रकृती बिघडल्यानंतर दगावत आहेत. असे प्रमाण जिल्ह्यात सध्या १ टक्का असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. होम आयसोलेशनमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या यापुढे आणखी वाढेल, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

चौकट ः कारणे काय?

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असणारे रुग्ण बरेचदा औषधे वेळेवर घेत नाहीत. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यानंतर अचानक परिस्थिती उद्भवल्यानंतर अशा लोकांची प्रकृती गंभीर बनत आहे. आजार अंगावर काढणे, हे एक प्रमुख कारण असल्यामुळे गृह विलगीकरणातील लोक दगावत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोट ः

होम आयसोलेशनमध्ये अनेक जण उपचार घेतात. या रुग्णांनी घराच्या बाहेर पडू नये. विश्रांती आणि योग्य आहार, औषधे वेळेवर घेतल्यास नक्कीच रुग्ण घरामध्येच बरे होऊ शकतात.

- डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चौकट : एकूण रुग्ण ८७९५८

बरे झालेले रुग्ण ७०६००

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १६७७६

गृह विलगीकरणातील रुग्ण ८९३०