शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

वेण्णा नदीपात्रात बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

महाबळेश्वर : वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला ...

महाबळेश्वर : वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पालिकेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांमध्ये खळबळ माजली आहे.

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यालगत वेण्णा लेक ते लिंगमळा यादरम्यान वेण्णा नदी वाहते. नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्याने या ठिकाणी नदीपात्र लहान आहे. जसजशी ही नदी पुढे जाते, तसतसे नदीपात्र रुंद होत जाते. वेण्णा लेक ते लिंगमळा यादरम्यान नदीपात्रात अनेक मिळकत धारकांनी अतिक्रमण करून तेथे विनापरवाना बांधकामे केली आहेत. या ठिकाणी अनेकांनी लाॅज, हाॅटेल, ढाबे व रेस्टाॅरंट सुरू केले आहेत. नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम केल्याने येथील पर्यावरणाची खूप हानी झाली आहे.

यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नदीपात्रातील बांधकामांकडे कायम दुर्लक्ष केल्याने येथील विनापरवाना बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालिकेत नव्याने आलेल्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नदीपात्राची पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने पाटबंधारे विभागाकडे रक्कम भरली आहे. तसेच विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा पाठवून विनापरवाना बांधकामे काढून घेण्यास कळविले आहे. पालिकेने शांताराम गणपत बावळेकर व अस्लम कासम नालबंद यांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या दोघांनीही पालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी बावळेकर व नालबंद यांच्या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी नदीपात्रातील बांधकामाबाबत घेतलेल्या निर्णयाने नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुन्हा दाखल झाल्याने आता या दोन बांधकामांबाबत पालिका कोणता निर्णय घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.