शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

वेण्णा नदीपात्रात बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

महाबळेश्वर : वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला ...

महाबळेश्वर : वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पालिकेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांमध्ये खळबळ माजली आहे.

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यालगत वेण्णा लेक ते लिंगमळा यादरम्यान वेण्णा नदी वाहते. नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्याने या ठिकाणी नदीपात्र लहान आहे. जसजशी ही नदी पुढे जाते, तसतसे नदीपात्र रुंद होत जाते. वेण्णा लेक ते लिंगमळा यादरम्यान नदीपात्रात अनेक मिळकत धारकांनी अतिक्रमण करून तेथे विनापरवाना बांधकामे केली आहेत. या ठिकाणी अनेकांनी लाॅज, हाॅटेल, ढाबे व रेस्टाॅरंट सुरू केले आहेत. नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम केल्याने येथील पर्यावरणाची खूप हानी झाली आहे.

यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नदीपात्रातील बांधकामांकडे कायम दुर्लक्ष केल्याने येथील विनापरवाना बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालिकेत नव्याने आलेल्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नदीपात्राची पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने पाटबंधारे विभागाकडे रक्कम भरली आहे. तसेच विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा पाठवून विनापरवाना बांधकामे काढून घेण्यास कळविले आहे. पालिकेने शांताराम गणपत बावळेकर व अस्लम कासम नालबंद यांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या दोघांनीही पालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी बावळेकर व नालबंद यांच्या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी नदीपात्रातील बांधकामाबाबत घेतलेल्या निर्णयाने नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुन्हा दाखल झाल्याने आता या दोन बांधकामांबाबत पालिका कोणता निर्णय घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.