शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

तडा गेलेली घरे आणि उफाळलेल्या भिंती... कसं रहायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील वाई आणि जावळी तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील वाई आणि जावळी तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि निवारा केंद्रात किती दिवस राहणार आणि इतरांनी दिलेल्या मदतीवर कसे जगणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सरकार आणि सामाजिक संघटनांनी मदत केली; पण ती तात्पुरती आहे. ज्या घरांमध्ये रहायला जायचे आहे, त्या घरांना अगोदरच तडे गेलेले आहेत. घरात पाण्याचे उफळे फुटल्यामुळे भीती उफाळलेली आहे. अशा परिस्थितीत त्या घरात राहणे शक्य नाही. त्यामुळे या लोकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात २००५ मध्ये जुई आणि कोंडीवते या गावांवर दरडी कोसळल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तशीच परिस्थिती ही वाई तालुक्यातील देवरुखवाडी आणि जावळी तालुक्यातील आंबेघर आणि मिरगाव या गावातील लोकांचीही झालेली आहे. गावातील अनेक घरे दरडीखाली गाडली गेल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे तर सध्या जी घरे आहेत ती राहण्यायोग्य नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे या गावातील लोकांना तात्पुरत्या स्वरुपात घरे बांधून देण्याची आवश्यकता आहे.

गावाच्या जवळपासच लोकांना पत्र्याच्या शेडची घरे बांधून काही दिवस सुरक्षित ठेवावे लागणार असून, त्यानंतर त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचे काम करावे लागणार आहे. या लोकांसाठी आता राहण्याचाच नाही तर काही दिवस पोटापाण्याचाही प्रश्न सतावणार आहे. घरातील सर्व साहित्य चिखलात गेले. कसाबसा जीव मुठीत घेऊन लोकं घराबाहेर पडली. तेव्हा जीव वाचविण्याची गरज होती; पण आता जीव जगविण्याची भ्रांत निर्माण होणार आहे. त्यामुळे रहायला निवारा आणि पोटाला अन्न अशा दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना झगडावे लागणार आहे.

पावसाने गावातील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या हंगामातील पीक तर वाया गेले असून, पुढील हंगामासाठी शेतीची डागडुजीही करावी लागणार आहे. त्यामुळे या लोकांचे पुनर्वसन करताना घर, अन्नपाण्याची व्यवस्था आणि नुकसानभरपाई अशा विविध पातळ्यांवर आढावा घ्यावा लागणार आहे. काही दिवस मदत मिळेल पण पुढे काय करायचे. आयुष्यभर एक-एक वस्तू साठवत उभारलेला संसार सोडून माळावर राहायची वेळ आलेल्या या लोकांचा प्रत्येकक्षणी जीव तीळ तीळ तुटत असतो. त्यातून सावरुन पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी समाज आणि सरकार या दोहोंच्याही मदतीची आवश्यकता आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित

एखादी घटना घडल्यानंतर नेते येऊन आश्वासन देऊन जातात. पण, पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत पडतो. कोयना परिसराला तर गेल्या साठ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न सतावतो आहे. धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे अजूनही योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे लोकांना ठाम भूमिका आणि विश्वास देण्याची आवश्यकता आहे.

अजूनही अनेक गावे दरडीखालीच

सातारा जिल्हा हा मुळात दुर्गम जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरडींच्या खोबणीत गावे वसलेली आहेत. कधी प्रशासनाने त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला तर कधी त्यांनी पुनर्वसन नाकारले. त्यामुळे अजूनही जिल्ह्यातील अनेक गावे दरडीखालीच वसलेली आहेत. त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर पडायचे आहे, पण योग्य पर्याय मिळत नसल्याने तर काहीजण आर्थिक अडचण असल्याने जीव धोक्यात घालून पावसाळ्यात रात्री जागून काढतात.