शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

‘कोविड स्पेशल’ रेल्वेमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST

कोरेगाव : लॉकडाऊननंतर आता सर्व काही सुरळीत होत असले, तरी रेल्वेने मात्र अद्याप निर्णय न घेतल्याने काही ठराविक गाड्या ...

कोरेगाव : लॉकडाऊननंतर आता सर्व काही सुरळीत होत असले, तरी रेल्वेने मात्र अद्याप निर्णय न घेतल्याने काही ठराविक गाड्या सुरू आहेत.

त्याचे नामकरण ‘कोविड स्पेशल’ असे करून, त्याच्या तिकिटाला काहीसा अधिभार

लावल्याने सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडणारे नाही. सातारा

जिल्ह्यातून धावणार्‍या पाच एक्स्प्रेसला कोविड स्पेशलचे बिरुद लावण्यात आले आहे. सातारा जिल्हा हा रेल्वेच्याबाबतीत अत्यंत सधन म्हणता येईल, असा आहे. दक्षिणोत्तर रेल्वे धावत असल्याने कोल्हापूर, सांगली, मिरज, कऱ्हाड,

सातारा, लोणंद ही शहरे पुण्या-मुंबईला जोडली गेली आहेत. अगदी देशातील दोन टोकांपर्यंत धावणाऱ्या रेल्वे सातारा जिल्ह्यातून प्रवास करत असल्याने

सर्वसामान्यांसाठी त्या अत्यंत उपयोगाच्या आणि फायद्याच्या ठरत होत्या.

जिल्ह्यात सातारा कऱ्हाडसह १३ रेल्वे स्थानके असून, ग्रामीण भागाशी रेल्वे

जोडली गेली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाले

असताना रेल्वेने देखील आपल्या सेवा बंद केल्या होत्या. अनलॉकनंतर आता सर्वच काही रुळावर आले असले तरी रेल्वे मात्र पूर्ण क्षमतेने रुळावर

आलेली नाही.

सातारा जिल्ह्यातून सद्यस्थितीत हुबळी- दादर, अजमेर-जोधपूर, वास्को-

दिल्ली या आंतरराज्य एक्स्प्रेससह कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस व कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस धावत आहेत. हुबळी-दादर एक्स्प्रेसला केवळ कराड येथे थांबा असून, सातारा थांबा बंद करण्यात आला आहे. उर्वरित एक्स्प्रेसपैकी अजमेर-जोधपूर, वास्को- दिल्ली या केवळ सातारा आणि कऱ्हाड

येथे थांबतात. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस व कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस या बऱ्यापैकी जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवर थांबतात. या पाचही एक्स्प्रेसला कोविड स्पेशल हे बिरुद लावण्यात आले असून,

निर्धारित तिकीटदरापेक्षा काही जादा शुल्क आकारले जात आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्या अजून उघडल्या गेल्या नाहीत, त्यामुळे संगणकीय प्रणाली अथवा मोबाईलवरून ऑनलाईन आरक्षण करूनच या एक्स्प्रेसमधून प्रवास

करावा लागत आहे. ज्यावेळी आरक्षण केले जाते, त्यावेळी नेमके किती शुल्क

आहे, हे प्रवाशांना समजत आहे. त्यामुळे नेमके प्रवास भाडे किती आणि नेमके

जादा शुल्क किती, याचा अद्याप मेळ लागत नाही.

चौकट :

पाचच एक्स्प्रेस रुळावर

लॉकडाऊनपूर्वी सातारा जिल्ह्यातून दहापेक्षा अधिक एक्स्प्रेस धावत

होत्या. दक्षिणेकडील राज्ये उत्तरेतील राज्यांना जोडणाऱ्या या एक्स्प्रेस होत्या. काही साप्ताहिक, तर काही दैनंदिन धावत होत्या. त्याचबरोबर

कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दोन पॅसेंजर धावत होत्या. आता सर्व बंद असून, केवळ पाच एक्स्प्रेस धावत आहेत.

चौकट :

एक्स्प्रेस धावतात, तर पॅसेंजर का नाही

पॅसेंजर अनिश्‍चित काळापर्यंत बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातील

प्रवाशांची गैरसोय होत आहे. एक्स्प्रेस धावतात, तर पॅसेंजर का नाही,

याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक आहेे.

- मनोहर वाघ, चांदवडी