शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पुस्तकाच्या नावे साताऱ्यात लाखोंचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

उंब्रज : कृषी पुस्तिकेच्या नावाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ पंचायत समितींमधून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. ...

उंब्रज : कृषी पुस्तिकेच्या नावाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ पंचायत समितींमधून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. शेतकरी नको म्हणत असतानादेखील जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थींकडून कोणतीही पावती न देता, प्रत्येकी २५० रुपये उकळण्यात आले असून, सहा महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना कोणतेही पुस्तक दिले गेलेले नाही, यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून फसवणूक झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे कऱ्हाड उत्तर तालुका सरचिटणीस प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.

या संदर्भात चौकशीसाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रशांत देशमुख म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेत सेस २०२०-२१ अंतर्गत कृषी विभागाच्या कृषी समिती सभेद्वारे शेतकऱ्यांची कृषी साहित्य व अवजारे खरेदीसाठी निवड करण्यात आली व शेतकऱ्यांना पूर्वसंमतीपत्र देऊन साहित्य खरेदी करावयास सांगण्यात आले. साहित्य खरेदी केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींमधून खरेदी केलेल्या वस्तूंची बिले प्रत्येक पंचायत समितीत संबंधित शेतकऱ्यांना जमा करण्यास सांगण्यात आले. पंचायत समितीच्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी कृषी पुस्तिकेच्या नावाखाली शेतकरी नको म्हणत असतानादेखील प्रत्येक लाभार्थीकडून कोणतीही पावती न देता, २५० रुपये गोळा करण्यात आले.

याबाबत प्रशांत देशमुख यांनी स्वत: लाचलुचपत विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार देखील केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये येऊन देशमुख यांच्यासमोर त्यांच्या पद्धतीने कारवाई केली होती. परंतु, गुन्हा दाखल केला नाही.

लाभार्थी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या २५० रुपयांचे आजअखेर कोणालाही कृषी पुस्तक मिळालेले नाही. या जमलेल्या लाखो रुपयांचा रकमेचा सातारा जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्यावतीने प्रशांत देशमुख यांनी केली आहे.