शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची आज वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : गतवर्षी २३ मार्चला सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आज ...

सातारा : गतवर्षी २३ मार्चला सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आज या घटनेला बरोबर एक वर्ष होत असून, त्यावेळी जिल्हा प्रशासनाने नेमकी कशी तयारी केली होती हे आजही अनेकांच्या डोळ्यांसमोरून तरळून जाते.

जगभरात कोरोनाने हाहाकार माजविल्यानंतर गतवर्षी २३ मार्चला साताऱ्यातही पहिला रुग्ण आढळून आला होता. दुबईवरून आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. संबंधित महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलीनीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या महिलेच्या देखरेखीसाठी विशेष म्हणजे तब्बल सहा पथके तैनात करण्यात आली होती. पहिलाच रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते. नेमका कसा उपाय करायचा यावर जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू होत्या. संबंधित महिलेच्या संपर्कात साताऱ्यातील कोणत्या व्यक्ती आल्या याची प्रशासनाकडून तातडीने माहिती घेण्यात आली. एवढेच नव्हे, तर खेड परिसर सील करण्यात आला. त्या परिसरातील रस्तेही अडविण्यात आले. इतकी प्रचंड खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. कोरोना हा परदेशातून भारतात प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच भीती होती. त्यातच साताऱ्यातही सापडलेला पहिला रुग्ण दुबईहून आला होता. त्यामुळे नागरिक आणखीनच अस्वस्थ झाले होते. या महिलेच्या अहवालानंतर दोन दिवसांत तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हळूहळू एकाचे दोन अशी रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणारे रस्ते पूर्णपणे बंद केले. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. सुरुवातीला कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने टम फ्ल्यूच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात होत्या, तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात होती. रस्त्यावर कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. तोंडाला मास्क न लावणाऱ्यावर प्रसंगी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. केवळ कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. मात्र, त्यानंतरही वर्षभर कोरोनाची रुग्ण संख्या मात्र कमी झाली नाही.