शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

कोरोनाबाधितांना मिळणार आता मानसिक बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना खरंतर मानसिक आधाराची गरज असून यावर उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आता सर्व बाधित रुग्णांना मानसिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. लस उपलब्ध झाल्याने लोक निर्धास्त झाले होते. मात्र, तरीही मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे सावट आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण हबकून जात आहेत. परिणामी रुग्णांची प्रकृती खालावत जात आहे. आपल्या आजूबाजूचे लोक दगावत असल्याचे माहीत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आणखीनच दहशतीखाली जातोय. हे सध्या सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून या बाधित रुग्णांना मानसिक बळाची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे या बाधित रुग्णांना जर रोजच्या रोज त्यांच्याशी जाऊन पॉझिटिव्ह विचार सांगून तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात. तुम्हाला काहीही झाले नाही. तुमचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत, असा धीर दिल्यानंतर आणखीनच त्यांना बळ येईल. रुग्णाच्या मनातील भीती कमी करण्याचा उद्देश डॉक्टरांचा आहे. एकीकडे कोरोनाबाधितावर औषधोपचार सुरूच राहणार आहेत. मात्र, त्याचबरोबर हे मानसिक बळ जर बाधित रुग्णाला दिले तर तो या धक्क्यातून सावरेल. शिवाय त्याच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन इतर रुग्णांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हा अनोखा उपक्रम या धकाधकीच्या वेळेतही राबवणार आहेत.

यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची टीमही यामध्ये सक्रिय राहणार आहे. तसेच इतर डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही जास्तीत-जास्त कोरोनाबाधितांसोबत चर्चा करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांना काय हवं आहे ते देणे, औषधोपचार वेळेवर करणे यासह त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून या बाधित रुग्णांना मानसिक आधार जर मिळाला तर यातूनही ते सहीसलामत सुखरूप घरी जावेत, यासाठी हा डॉक्टरांचा अनोखा लढा यापुढे सुरू राहणार आहे.

चौकट : कोरोना रिपोर्ट आल्यानंतर अनेकजण घाबरून जात आहेत. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही. आपले मानसिक संतुलन ढळून द्यायचे नाही. आपण खंबीर आहोत, हे मनाला ठणकावून सांगितले पाहिजे. हे बाधित रुग्णांना पटवून देण्यासाठी आता आमची टीम सज्ज झाली आहे.