शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

कोरोनाबाधितांना मिळणार आता मानसिक बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना खरंतर मानसिक आधाराची गरज असून यावर उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आता सर्व बाधित रुग्णांना मानसिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. लस उपलब्ध झाल्याने लोक निर्धास्त झाले होते. मात्र, तरीही मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे सावट आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण हबकून जात आहेत. परिणामी रुग्णांची प्रकृती खालावत जात आहे. आपल्या आजूबाजूचे लोक दगावत असल्याचे माहीत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आणखीनच दहशतीखाली जातोय. हे सध्या सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून या बाधित रुग्णांना मानसिक बळाची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे या बाधित रुग्णांना जर रोजच्या रोज त्यांच्याशी जाऊन पॉझिटिव्ह विचार सांगून तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात. तुम्हाला काहीही झाले नाही. तुमचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत, असा धीर दिल्यानंतर आणखीनच त्यांना बळ येईल. रुग्णाच्या मनातील भीती कमी करण्याचा उद्देश डॉक्टरांचा आहे. एकीकडे कोरोनाबाधितावर औषधोपचार सुरूच राहणार आहेत. मात्र, त्याचबरोबर हे मानसिक बळ जर बाधित रुग्णाला दिले तर तो या धक्क्यातून सावरेल. शिवाय त्याच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन इतर रुग्णांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हा अनोखा उपक्रम या धकाधकीच्या वेळेतही राबवणार आहेत.

यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची टीमही यामध्ये सक्रिय राहणार आहे. तसेच इतर डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही जास्तीत-जास्त कोरोनाबाधितांसोबत चर्चा करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांना काय हवं आहे ते देणे, औषधोपचार वेळेवर करणे यासह त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून या बाधित रुग्णांना मानसिक आधार जर मिळाला तर यातूनही ते सहीसलामत सुखरूप घरी जावेत, यासाठी हा डॉक्टरांचा अनोखा लढा यापुढे सुरू राहणार आहे.

चौकट : कोरोना रिपोर्ट आल्यानंतर अनेकजण घाबरून जात आहेत. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही. आपले मानसिक संतुलन ढळून द्यायचे नाही. आपण खंबीर आहोत, हे मनाला ठणकावून सांगितले पाहिजे. हे बाधित रुग्णांना पटवून देण्यासाठी आता आमची टीम सज्ज झाली आहे.