शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांना मिळणार आता मानसिक बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना खरंतर मानसिक आधाराची गरज असून यावर उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आता सर्व बाधित रुग्णांना मानसिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. लस उपलब्ध झाल्याने लोक निर्धास्त झाले होते. मात्र, तरीही मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे सावट आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण हबकून जात आहेत. परिणामी रुग्णांची प्रकृती खालावत जात आहे. आपल्या आजूबाजूचे लोक दगावत असल्याचे माहीत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आणखीनच दहशतीखाली जातोय. हे सध्या सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून या बाधित रुग्णांना मानसिक बळाची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे या बाधित रुग्णांना जर रोजच्या रोज त्यांच्याशी जाऊन पॉझिटिव्ह विचार सांगून तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात. तुम्हाला काहीही झाले नाही. तुमचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत, असा धीर दिल्यानंतर आणखीनच त्यांना बळ येईल. रुग्णाच्या मनातील भीती कमी करण्याचा उद्देश डॉक्टरांचा आहे. एकीकडे कोरोनाबाधितावर औषधोपचार सुरूच राहणार आहेत. मात्र, त्याचबरोबर हे मानसिक बळ जर बाधित रुग्णाला दिले तर तो या धक्क्यातून सावरेल. शिवाय त्याच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन इतर रुग्णांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हा अनोखा उपक्रम या धकाधकीच्या वेळेतही राबवणार आहेत.

यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची टीमही यामध्ये सक्रिय राहणार आहे. तसेच इतर डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही जास्तीत-जास्त कोरोनाबाधितांसोबत चर्चा करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांना काय हवं आहे ते देणे, औषधोपचार वेळेवर करणे यासह त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून या बाधित रुग्णांना मानसिक आधार जर मिळाला तर यातूनही ते सहीसलामत सुखरूप घरी जावेत, यासाठी हा डॉक्टरांचा अनोखा लढा यापुढे सुरू राहणार आहे.

चौकट : कोरोना रिपोर्ट आल्यानंतर अनेकजण घाबरून जात आहेत. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही. आपले मानसिक संतुलन ढळून द्यायचे नाही. आपण खंबीर आहोत, हे मनाला ठणकावून सांगितले पाहिजे. हे बाधित रुग्णांना पटवून देण्यासाठी आता आमची टीम सज्ज झाली आहे.