शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही कुटुंबाचा कर्ता उपचाराविना कोरोनाने हिरावू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST

वाई : ‘तरुणांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे, पण दुर्दैवाने कोरोनोची दुसऱ्या लाटेच्या महामारीत तरुणांसह घरातील कर्ता पुरुष ...

वाई : ‘तरुणांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे, पण दुर्दैवाने कोरोनोची दुसऱ्या लाटेच्या महामारीत तरुणांसह घरातील कर्ता पुरुष गेल्याने आख्खे कुटुंब आधारहीन झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीलाच वाई मतदारसंघात सहाशे बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. यापुढे कोणत्याही कुटुंबातील उपचाराविना कुटुंबाचा कर्ता व्यक्ती जाता कामा नये,’ असे भावनिक उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.

खानापूर ता. वाई येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप, महादेव मस्कर, सरपंच पूजा जाधव, माजी सरपंच किरण काळोखे, सदस्य अशोकराव जाधव, प्रकाश जाधव, पूजा जाधव, अर्चना जाधव, अर्चना भोसले, अनिता पवार, दिलीप मंडले, सोपान जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘गावात कोरोनोचा शिरकाव होऊ नये याची काळजी गावातील सरपंच सर्व सदस्यांसह गाव कारभाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनी घ्यावी. शासनाच्या आदेशांचे पालन करून गावोगावी विलगीकरण कक्ष तयार करुन त्या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारली पाहिजे. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग काय करु शकतो. हे गेली पंधरा महिने अनुभवतो आहे. खानापूर या गावातील कर्तीधर्ती चांगली माणसे गेली याचे दुःख आहे. पहिल्या लाटेचा वाईट अनुभव घेऊन आपण आत्ता दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी आहे. याआधी फारच रुग्ण होते. त्या वेळी गावे लॉक करून रुग्णसंख्या आटोक्यात आणली, पण दुसऱ्या लाटेवेळी आपण सगळेच गाफील राहिलो. प्रशासनाने घालून दिलेले नियम प्रत्येकाने झुगारून टाकले होम आयसोलेशन पध्दतीने आपला घात झाल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे वयोवृद्धांपेक्षा तरुणांचा मृत्यूचा आकडा वाढला.’

चौकट

रुग्ण नसला तरी गाफीलपणा नको...

सध्या गावात रुग्ण नसला तरी गाफील राहू नका. येणाऱ्या तिसऱ्या लाटेची काळजी घ्यावी लागेल. उद्यापासून वाईची बाजारपेठ सुरु होणार आहे. तेथे होणारी गर्दी ही कोरोनोला आमंत्रण देणार आहे हे नक्कीच. दोन महिन्यांनंतर येणारी तिसरी लाट ही लहान मुलांवर येणार आहे. त्याला ही आपण सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. येथील ग्रामस्थांना उपकेंद्र हवे आहे त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल,’ असेही मकरंद पाटील यांनी सांगितले.

फोटो २२वाई-खानापूर

खानापूर येथील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच पूजा जाधव, अनिल जगताप उपस्थित होते. (छाया : पांडुरंग भिलारे)