शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

कोणत्याही कुटुंबाचा कर्ता उपचाराविना कोरोनाने हिरावू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST

वाई : ‘तरुणांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे, पण दुर्दैवाने कोरोनोची दुसऱ्या लाटेच्या महामारीत तरुणांसह घरातील कर्ता पुरुष ...

वाई : ‘तरुणांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे, पण दुर्दैवाने कोरोनोची दुसऱ्या लाटेच्या महामारीत तरुणांसह घरातील कर्ता पुरुष गेल्याने आख्खे कुटुंब आधारहीन झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीलाच वाई मतदारसंघात सहाशे बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. यापुढे कोणत्याही कुटुंबातील उपचाराविना कुटुंबाचा कर्ता व्यक्ती जाता कामा नये,’ असे भावनिक उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.

खानापूर ता. वाई येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप, महादेव मस्कर, सरपंच पूजा जाधव, माजी सरपंच किरण काळोखे, सदस्य अशोकराव जाधव, प्रकाश जाधव, पूजा जाधव, अर्चना जाधव, अर्चना भोसले, अनिता पवार, दिलीप मंडले, सोपान जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘गावात कोरोनोचा शिरकाव होऊ नये याची काळजी गावातील सरपंच सर्व सदस्यांसह गाव कारभाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनी घ्यावी. शासनाच्या आदेशांचे पालन करून गावोगावी विलगीकरण कक्ष तयार करुन त्या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारली पाहिजे. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग काय करु शकतो. हे गेली पंधरा महिने अनुभवतो आहे. खानापूर या गावातील कर्तीधर्ती चांगली माणसे गेली याचे दुःख आहे. पहिल्या लाटेचा वाईट अनुभव घेऊन आपण आत्ता दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी आहे. याआधी फारच रुग्ण होते. त्या वेळी गावे लॉक करून रुग्णसंख्या आटोक्यात आणली, पण दुसऱ्या लाटेवेळी आपण सगळेच गाफील राहिलो. प्रशासनाने घालून दिलेले नियम प्रत्येकाने झुगारून टाकले होम आयसोलेशन पध्दतीने आपला घात झाल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे वयोवृद्धांपेक्षा तरुणांचा मृत्यूचा आकडा वाढला.’

चौकट

रुग्ण नसला तरी गाफीलपणा नको...

सध्या गावात रुग्ण नसला तरी गाफील राहू नका. येणाऱ्या तिसऱ्या लाटेची काळजी घ्यावी लागेल. उद्यापासून वाईची बाजारपेठ सुरु होणार आहे. तेथे होणारी गर्दी ही कोरोनोला आमंत्रण देणार आहे हे नक्कीच. दोन महिन्यांनंतर येणारी तिसरी लाट ही लहान मुलांवर येणार आहे. त्याला ही आपण सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. येथील ग्रामस्थांना उपकेंद्र हवे आहे त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल,’ असेही मकरंद पाटील यांनी सांगितले.

फोटो २२वाई-खानापूर

खानापूर येथील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच पूजा जाधव, अनिल जगताप उपस्थित होते. (छाया : पांडुरंग भिलारे)