शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामीण भागात कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे दिसून येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोना फैलावण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई-पुण्याहून आरामबस अक्षरश: प्रवाशांनी तुडुंब भरून रातोरात येत आहेत. या प्रवाशांकडे ना ई-पास आहे, ना कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र, त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना कसा आटोक्यात येणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी मुंबई-पुण्याहून लोक आपापल्या गावी आले होते. यातील काहींना गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये गतवर्षी फारसे रुग्ण आढळले नाहीत. त्यावेळी ग्रामीण भाग सुरक्षित होता. मुंबई-पुण्याहून एखादा व्यक्ती गावात आल्यानंतर त्या व्यक्तीला सक्तीने दहा दिवस गृह अलगीकरणामध्ये ठेवले जात होते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचाही गाफीलपणा समोर आला. गावात बाहेरून कोणतीही व्यक्ती आली तर त्या व्यक्तीची ना चाचणी केली जात होती ना त्या व्यक्तीला गृह अलगीकरणात ठेवले जात होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना प्रचंड वेगाने फैलावला. आता तर मुंबई-पुण्याहून प्रवाशांच्या आरामबस रातोरात गावी येऊ लागल्या आहेत. या बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांकडे ना ई-पास आहे, ना त्यांची कोरोना चाचणी झाली आहे. आपलेच लोक गावी येताहेत म्हटल्यावर ग्रामस्थांनीही अबोला धरून तक्रार केली नाही. त्याचे परिणाम आता सर्वांनाच भोगायला लागत आहेत. संपूर्ण गावे कोरोनाबाधित आढळून येऊ लागली आहेत. मुंबई, पुण्याहून या आरामबस सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना, सातारचे पोलीस काय करत आहेत, असाही प्रश्न नागरिकांकडून आता विचारला जात आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित असू शकतात. त्यांची कोरोना चाचणी झाली तर कोरोनाचा संसर्ग गावात होण्यापासून रोखला जाऊ शकतो. सध्या कोरोनाची कसलीही लक्षणे नसतानाही अनेकांचा अहवाल बाधित येत आहे. असे लोक गावामध्ये इकडून-तिकडे फिरत असतात. मात्र, तोपर्यंत अशा लोकांकडून अनेकजण बाधित झालेले असतात. पहिल्या लाटेमध्ये सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेमध्ये असुरक्षित कसा झाला, याचे सर्वांनाच कोडे पडले होते. मात्र, गत महिनाभरापासून ग्रामीण भागामध्ये मुंबई-पुण्याहून आलेल्या प्रवाशांची संख्या पाहता, याचे कोडे चटकन प्रशासनासह आरोग्य विभागालाही उलगडले. मात्र, तोपर्यंत गावेच्या गावे बाधित झाली होती. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. अशाप्रकारची रातोरात होणारी बेकायदा वाहतूक जिल्हा प्रशासनाने रोखायला हवी, तरच ग्रामीण भागात घोंगावणारे कोरोनाचे संकट आटोक्यात येईल. अन्यथा ग्रामीण भागातील परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट : गाव तुमचंच आहे पण काळजी घ्या!

वाढत्या कोरोनाच्या धास्तीने मुंबई-पुण्याहून लोक आपापल्या गावी येत आहेत. आपल्या स्वतःच्या घरी येणे, हा त्यांचा हक्कच आहे. मात्र, गावी येताना आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात तर घालत नाही ना, याचा विचारही मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांनी करणे गरजेचे आहे. स्वतःची कोरोना चाचणी करून घेत ती निगेटिव्ह असेल आणि तुम्ही गावात आलात तर त्याचा कोणालाही त्रास नाही. मात्र, चाचणी न करता तुम्ही स्वतःचा आणि गावकर्‍यांचा तसेच कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहात, हे विसरू नका. गाव तुमचंच आहे पण काळजी घ्या, असे म्हणण्याची वेळ आता गावकऱ्यांवर आली आहे.