शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्णाचे पलायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

फलटण : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका ज्येष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार ...

फलटण : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका ज्येष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा, असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का? असा सवाल व्यक्त होत आहे.

फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी येथील मालोजीनगर भागात एका दुकानाच्या कट्ट्यावर संबंधित बाधित व्यक्ती येऊन बसली.

त्यावेळी तिथे बसलेल्या पत्रकारांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांच्या हाताला सलाईनची पट्टी दिसून आल्याने त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण जिंती (ता. फलटण )येथील असल्याचे सांगितले. त्याचवेळी कोळकी गणाचे पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे हे तिथे आले व त्यांनी जिंती येथे चौकशी केली असता संबंधित ज्येष्ठ व्यक्ती जिंती येथीलच असून, संबंधित व्यक्ती कोरोना बाधित असून, ती फलटण शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून त्यांना सांगण्यात आले. यानंतर उपस्थित पत्रकारांनी या प्रकाराची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. यानंतर नगरपरिषदेने पाठविलेल्या रुग्णवाहिकेमधून त्यांना पुन्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे संबंधित व्यक्तीस आतमध्ये घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. तेव्हा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी फोन करताच त्यांना दाखल करून घेण्यात आले.

कोळकी येथील पोलीस गाडी, रुग्णवाहिका सायरन वाजवित आल्याने या परिसरात काहीकाळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. परंतु वस्तुस्थिती समजताच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

चौकट..

लोकप्रतिनिधींना लक्ष घालण्याची मागणी..!

दोनच दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला होता. आमदार दीपक चव्हाण यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाने आपला कारभार सुधारावा, अशा शब्दात फटकारले होते. त्यानंतर दोनच दिवसांत हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात आणखीन गंभीर घटना घडण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.