शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

वर्णे गाव ठरतोय कोरोना ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

नागठाणे : वर्णे (ता. सातारा) येथे घेण्यात आलेल्या अँटिजेन कोरोना चाचणी शिबिरात तब्बल एकवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हे ...

नागठाणे : वर्णे (ता. सातारा) येथे घेण्यात आलेल्या अँटिजेन कोरोना चाचणी शिबिरात तब्बल एकवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हे गाव कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. त्यामुळे नागठाणे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या शिबिरात एकूण १४० जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यापूर्वी मागील आठ ते दहा दिवसांपासून दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील दोघे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, इतरांचे घरामध्येच अलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत एकूण ३२ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य विभागातून समजते.

वर्णेत मागील शनिवारी होणारे लसीकरण शिबिर लसीच्या तुटवड्यामुळे स्थगित करण्यात आले होते. ज्यांना शक्य होते त्यांनी नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घेतली.

मागील दहा दिवसांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्याने व पुढे रुग्णांमध्ये वाढ होऊ नये म्हणून गावाने प्रशासनाच्या मदतीने पुढील दहा दिवसांसाठी स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार सुनील मुनाळे, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बोरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डाळिंबकर, ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायत सदस्य व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दिनांक १६ ते २५ एप्रिल या दहा दिवसांत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. पवार, आरोग्य विस्तार अधिकारी धर्माधिकारी, मंडल अधिकारी राजेंद्र लेंभे, डॉ. अनघा तारळेकर, सुधाकर बोधे, पोलीस कर्मचारी विजय देसाई, सरपंच विजय पवार, उपसरपंच कुसूम पवार, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे, तलाठी कोळी, आरोग्य सेविका ताथवडेकर, ग्रामपंचायत व ग्राम दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

चौकट..

गावाबाहेरील इतर कोणालाही गावात प्रवेश बंद...

‌या कालावधीत गावातील मेडिकल, दूध संकलन केंद्र ही दिवसातील ठराविक वेळ सुरु ठेवण्यात येतील, तर इतर सर्व दुकाने व सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात येतील. ग्रामस्थांना कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार नाही. शेतीची कामे घरातील एखादं-दुसऱ्या व्यक्तीने गरजेनुसार करावीत. गावातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही गावाबाहेर जाता येणार नाही व गावाबाहेरील कोणालाही गावात प्रवेश दिला जाणार नाही.‌