शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना परवडला; पण लस नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:11 IST

वाठार स्टेशन : कोरोना लस कधी येणार याची गेली वर्षभराची संपूर्ण जगाला लागलेली प्रतीक्षा अखेर संपली असून, आता कोरोना ...

वाठार स्टेशन :

कोरोना लस कधी येणार याची गेली वर्षभराची संपूर्ण जगाला लागलेली प्रतीक्षा अखेर संपली असून, आता कोरोना लस ग्रामीण भागात खेडोपाड्यात दाखल झाली आहे. मात्र या लसीबाबत सध्या मोठे गैरसमज पसरल्याने ग्रामीण भागात या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांत कोरोना परवडला; मात्र लस नको, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेली वर्षभर कोरोना महामारीने ग्रामीण भागासह संपूर्ण देश हतबल झाला आहे. या रोगाबाबत लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी जगभरात देशभरात मोठे प्रयत्न सुरू होते. अखेर या आजाराबाबतीत लस शोधण्यात आपल्या देशाला यश मिळाले असून, सध्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार आदींना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल, अशा लोकांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही लस देण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या लसीबाबतीत ग्रामीण भागात मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत, ही लस घेतल्यानंतर तीन दिवस ताप येतो. हात दुखतो असे, या बाबतीत गैरसमज पसरत असल्याने आता लस दारात आली असताना कोरोना परवडला; पण लस नको, अशी भावना सध्या ग्रामीण भागातील लोकांची झाली आहे.

मात्र कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यू होत आहेत.

लसीकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुद्धा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे जरूरी आहे. यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती आरोग्य विभाग देत आहेत इतर लस प्रमाणेच ही लस असून, प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांनी ही लस तत्काळ घ्यावी, अशी माहिती आरोग्य विभाग देत आहे. या बाबतीत लोकांनी लसीबाबतीत मनात असलेले गैरसमज काढून टाकून लसीकरण मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.

सध्या प्रत्येक आरोग्य केंद्रात आठवड्यातील तीन दिवस ही लस दिली जात आहे. यासाठी गावोगावी आरोग्यसेविका या बाबतीत माहिती देत आहेत. लस घेण्यासाठी आपले आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.

चौकट..

आजाराला हरविण्यासाठी पुढाकार घ्यावा..

कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, बीसीजी, गोवर सारखीच ही लस आहे. कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर ती थोडी दुखते तशीच ही पण लस आहे. त्याला घाबरून न जाता लस घेऊन या आजाराला हरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, या लसीकरणानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्वसामान्य दुष्परिणाम साधारणपणे दिसतात. ते

१ ते २ दिवस राहतात. काहींना तर काहीच लक्षणे दिसत नाहीत. काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकारशक्ती कार्यान्वित झाल्याचे लक्षण आहे.

कोट..

लस घ्यायला जाण्यापूर्वी उपाशीपोटी जाऊ नये. जाताना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन जावे. पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसांनंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते; पण त्यासाठी २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.

-डॉ. रुपाली जाधव, आरोग्य अधिकारी, पळशी प्रा. आरोग्य केंद्र