शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गृहविलगीकरणातील रुग्ण ठरतायत कोरोनाचे वाहक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे, तर दुसरीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे, तर दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने ७० टक्के रुग्ण हे घरातूनच उपचार घेत आहेत. या रुग्णांना घरपोच सेवा मिळत नसल्याने त्यांना स्वत: बाजारपेठेत खरेदीसाठी ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे कोण बाधित आहे आणि कोण नाही याचा कसलाच मागमूस लागत नसल्याने गृहविलगीकरणातील रुग्ण कोरोनाचे वाहक ठरू लागले आहेत.

सातारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे. दररोज दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. रुग्णांना उपचारासाठी बेडच मिळत नसल्याने घरातून उपचार घेण्याशिवाय बहुतांश रुग्णांपुढे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. सद्यस्थितीला सातारा शहरात तब्बल ८५० रुग्ण गृहविलगीकरणतून उपचार घेत आहेत, तर २५० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

गृहविलगीकरणातील रुग्णांना प्रशासनाकडून केवळ फोनद्वारे संपर्क साधला जात आहे आणि त्यांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची विचारपूस केली जात आहे. या पलीकडे कोणत्याही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात नाही. कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल प्राप्त होऊन त्याचा पूर्ण पत्ता शोधेपर्यंत तीन ते चार दिवसांचा कालावधी निघून जातो. पत्ता मिळाल्यानंतर पालिकेकडून तो परिसर सील केला जातो. या कालावधीत गृहविलगीकरणातील नागरिक निर्धास्त फिरत असतात. कोणत्याच मूलभूत सुविधा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध होत नसल्याने हे रुग्ण खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. काही रुग्ण स्वत:ची व नागरिकांची काळजी घेत असले तरी धोका हा कायमच आहे. अशा रुग्णांमुळेच शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. याला नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

(पॉइंटर)

गतवर्षी राबविलेल्या उपाययोजना

- पालिका प्रशासनाने गतवर्षी गृहभेटीद्वारे नागरिकांचा सर्व्हे केला. त्यांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवल्या.

- पर जिल्ह्यातून अथवा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर प्रशासनाची बारकाईने नजर होती.

- कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी केली जात होती.

- पालेभाज्या, दूध औषधांसह सर्व अत्यावश्यक सेवा नागरिकांना घरपोच पुरविल्या जात होत्या.

- यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागातील दुकानदारांची मोबाइल क्रमांकासह यादी जाहीर केली होती.

- अग्निशमन बंब आतून संपूर्ण शहर निर्जंतुक केले होते

(पॉईंटर)

यंदा राबविलेल्या उपाययोजना

- बाधित रुग्ण वाढत असताना पालिकेकडून अद्याप गृहभेटीद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व्हेचे नियोजन करण्यात आले नाही.

- ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील त्या अपार्टमेंट अथवा परिसरातील नागरिकांचीच कोरोना चाचणी केली जात आहे.

- एखादे घर किंवा अपार्टमेंट प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जात आहे.

- या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविल्या जात नाही.

- पालिकेची निर्जंतुकीकरण मोहीम केवळ प्रतिबंधित क्षेत्रातच राबविली जात आहे.

- प्रतिबंधित क्षेत्रात देखरेखीसाठी एका देखील अधिकाऱ्यांची नेमणूक यंदा केलेली नाही.

(पॉइंटर)

सातारा शहरातील बाधित : ११००

गृहविलगीकरणातील रुग्ण : ८५०

उपचार घेत असलेले : २५०

आतापर्यंत मृत्यू : १३७

(चौकट)

आणखी कशाची वाट पाहताय..

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे सातारा तालुक्यात आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत. गृहविलगीकरणातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. शहरात सर्व्हे केल्यास कोरोना संशयित व बाधित रुग्णांचा शोधही घेता येईल. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, शिक्षक या कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा कोरोना लढ्यासाठी सहभाग वाढवायला हवा. तरच कोरोनाची साखळी सुटण्यास मदत होईल.

फोटो : २१ कंटेन्मेंट झोन