शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ७०० वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

लोणंद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीही रद्द झाला. शेकडो वर्षांची ...

लोणंद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीही रद्द झाला. शेकडो वर्षांची परंपरा अखंडित राहावी, यासाठी आळंदीहून माऊलींच्या पादुका घेऊन बस पंढरपूरकडे रवाना झाली.

यावेळी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे राहून भक्तांनी माऊलींच्या पादुका घेऊन जाणाऱ्या फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसलाच नमस्कार करत दर्शन घेतले.

पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यातील शेवटचे ठिकाण म्हणजे नीरा होय. नीरा नदी ओलांडली की पाडेगावपासून या पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश होतो. मात्र, यावेळीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सातशे वर्षांपासून असणारी नीरा नदीवरील माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची परंपरा खंडित झाली. यावेळी पुणेकर माऊलींच्या सोहळ्याला निरोप देतात तर सातारा जिल्ह्यातील अधिकारी व राजकीय नेतेमंडळी माऊलींच्या स्वागतासाठी याच नीरा नदीच्या काठी उभे असतात. लाखो भाविकांचा, वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर, माऊलींचा जयघोष करत याठिकाणी माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाते. नीरा ते लोणंदपर्यंत संपूर्ण रस्त्यावर विठ्ठलाचा गजर करत ज्ञानोबा तुकाराम माऊलीचा जयघोष करत रस्ते वारकऱ्यांनी व त्यांच्या वाहनांनी तुडुंब भरलेले असतात.

मात्र, यंदा यातील काहीच दिसत नव्हते. माऊलींचा पालखी सोहळा हा नीरा नदीच्या लहान पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो, तो पूलही आज निर्मनुष्य दिसत होता. यंदा माऊलींच्या पादुका एस. टी.ने पंढरपूरकडे रवाना झाल्याने नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात माऊलींचे केले जाणारे स्वागत यांना भाविक मुकले आहेत.

लोणंद रेल्वे पुलावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. वारकरी संप्रदायाने याठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून भजन, कीर्तन सुरू केले होते. अनेक नागरिकांनी पंढरपूरकडे रवाना होत पादुका असलेल्या बसवर फुलांची उधळण करत... माऊलींचा जयघोष करत दर्शन घेतले. लोणंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

चौकट

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडते. पण यावेळी माऊलींच्या अश्वाविनाच हा पालखी सोहळा पार पडत असल्याने शेकडो वर्षांची चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणाची परंपराही सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली.

कोट

यंदा मात्र ना नीरा स्नान... ना भजन, कीर्तनाचा आनंद... ना चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण... हे सारे यंदा चुकलेच. म्हणूनच वारकऱ्यांच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, वारकरी संप्रदायाने यावेळीही प्रशासनाला साथ देत हा सोहळा काही मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे रवाना केला.

- ह. भ. प. शंकर मर्दाने, लोणंद

सचिव, खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय