शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व घरच्या घरी पंचकर्मे महत्त्व !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:41 IST

वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे नस्य म्हणजेच औषधी तेल किंवा तुपाचे थेंब नाकपुडीमध्ये दिवसांतून ३ वेळा टाकावेत यामुळे नाकातील कोरडेपणा कमी होऊन ...

वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे नस्य म्हणजेच औषधी तेल किंवा तुपाचे थेंब नाकपुडीमध्ये दिवसांतून ३ वेळा टाकावेत यामुळे नाकातील कोरडेपणा कमी होऊन वातावरणातील धूर, धूळ, जंतूंचे नाकाद्वारे होणारे संक्रमण रोखले जाते. घशातील कफाचा अतिरिक्त चिकटपणा कमी होऊन घशाची खवखव, दुखणे, आवाजातील बदल ठीक करण्यासाठी त्रिफळा, सेंधव व हळदीच्या काढ्याने गुळ्या कराव्यात. १ चमचा हळद व १ चिमूटभर दालचिनी पावडर व १ चमचा मध यांचे चाटण करावे. वेखंड पावडरची धुरी घेतल्याने कफदोष कमी होतो. खाेकल्याची ढास कमी करण्यासाठी शरीर प्रकृतीनुसार तीळ तेल, मोहरी तेल, खोबरेल तेल व मिठाचा लेप छाती, पाठ, मानेला लावून शेक घ्यावा. रोज रात्री तळपायांना एरंडेल तेलाने मसाज करावा. या काळात दिवसभर दोन लिटर पाण्यात ५० ग्राम चिमूट वेलदोडे पुड टाकून केलेले पाणी प्यावे. शिवाय सकाळच्या वेळेत तोंडामध्ये थोड्या वेळासाठी तिळाचे तेल धारण करावे. कपाळावरही जायफळ, सुंठ किंवा ज्येष्ठमधाचा लेप लावावा.

वैद्याच्या मार्गदर्शनाखाली गूळ व हळद यांचा विरेचन विधी घरी करता येतो. सलग १२ दिवसांचा हा उपक्रम आहे. यामुळे शरीरशुद्धी होऊन इम्युनिटी वाढते. रोज सकाळी उपाशीपोटी पहिल्या दिवशी प्रत्येकी एक चमचा हळद व गूळ एकत्र करून खाणे. त्यानंतर पुढे पाच दिवस याचे प्रमाण वाढवत जाणे. त्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा केवळ मूगडाळीचे सूप, मूगडाळीचे धिरडे आणि रोज रात्री भाजी भाकराचा आहार घ्यावा. सातव्या दिवशी पोटभर दहीभात किंवा ताक भात खावा. आठव्या दिवशी सकाळी उपाशी ८० ते १०० मिली एरंडेल तेल सुंठीच्या काढ्यासोबत प्यावे. यामुळे जुलाब होऊन शरीरशुद्धी होते. जुलाबा दिवशी केवळ भाताची पेज घ्यावी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. जन्म प्रकृतीनुसार औषधी काढ्याचा एनिमा देणे, फेब्रुवारी ते मे महिन्यात जन्मलेल्यांना तीळ तेलाने सर्वांगाला मसाज, जून ते सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्यांना मोहरीचे तेल तर ऑक्टोबर ते जानेवारीत जन्मलेल्यांना खोबरेल तेलाने मसाज करतात. डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार स्टीमबाथ दिली जाते. जानुबस्ती, कटीबस्ती, लेपन चिकित्सा व रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना अभ्यंग व तेलाचा एनिमा दिला जातो. कोविड काळात शरीराला अशा सर्व्हिसिंगची गरज असते. याबरोबरच मन:शांतीसाठी योग, प्राणायाम, ध्यान धारणा यामुळे रुग्णांना फायदा होतो.

-वैद्य सुयोग दांडेकर,

-प्रधान वैद्य, प्रकृती हेल्थ सेंटर, सातारा