शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

भाग्यलक्ष्मीच्या कुशीत पिकांना तांब्याने पाणी

By admin | Updated: July 15, 2015 21:17 IST

\कोयना परिसरात पिकांची होरपळ : शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची खांद्यावर घागर; तरवे वाळण्याची भीती

राजेंद्र सावंत - मणदुरे -पावसाचे माहेरघर असणाऱ्या पाटण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सिंचनक्षेत्र नसलेल्या कोरडवाहू क्षेत्रावर संकट ओढावले आहे. कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी डोक्यावर हंडा घेऊन तांब्यांने पाणी घालून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड दिसत आहे.उन्हाळ्यात पडलेल्या वळवाने शेतकऱ्यांनी पाटण तालुक्यात मशागतीची कामे चांगल्या पद्धतीने उरकून घेतली होती. २ जूनपासून तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली. पेरण्यांची कामे चांगल्या पद्धतीने होऊन पिकांची उगवणही जोमात झाली आहे. शेतकऱ्यांनी कोळपणीची कामेही उरकून घेतली आहेत. भांगलणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी पिकांना खतांची मात्रा दिल्याने व सध्या पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पाटण तालुक्याच्या मोरणा, मणदुरे, कोयना विभागात लागणीच्या भातांची लागण मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्यासाठी तृप्ती, आर चोवीस, तेलदौसा, आजरा आदी जातींच्या भाताची लागवड केली जात असते. शेतकऱ्यांनी त्यासाठी मशागती करून भाताचे तरवे केले आहेत. काही शेतकऱ्यांनी वाढीसाठी या तरव्यांवर खते विस्कटली आहेत. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिली असून, उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कोवळ्या पिकांना उन्हाच्या झळा सोसत नाहीत. पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. या पावसाळ्यात सुरुवातीलाच कोयना परिसरात पंधरा दिवसांमध्ये विक्रमी १ हजार २०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु ज्याठिकाणी डोंगर परिसरात सिंचनाची सोय नाही, त्याठिकाणी हे तरवे जगविण्यासाठी डोक्यावरून पाणी आणून पिकांना द्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. आणखी आठ दिवस अशीच पावसाने ओढ दिल्यास शेतकऱ्यांची हातची पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. डोंगर कपारीतील गावात नाचणी हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते; मात्र तरवे वाळत असल्यामुळे ते जगविण्यासाठी पाणी डोक्यावरून आणूनच तांब्याने ते तरव्यांवर शिंपडावे लागत आहे. शेतकऱ्यांना मदत हवी...पावसाने ओढ दिल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी १ टक्का युरिया १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास पिके तग धरू शकतात. शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी ही उपाययोजना करणे गरजेचे आहे.- एस. एस. चव्हाणकृषी सहायक, पाटणकोणतेही पीक घ्यायचे असल्यास सामान्य शेतकऱ्याला अगोदर कर्जाचे ओझे घ्यावे लागते. आता पावसाने ओढ दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. तांब्याने पाणी देऊन किती दिवस ही पिके तग धरणार? शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. - संजय शिंदेशेतकरी, चिटेघरकोयना धरणातील पाणीसाठा५०.९८ टीएमसीकोयना विभागातील एकूण पाऊस१,२४३ सेमीनवजा विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमीमहाबळेश्वर विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमी