शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळानंतर अवकाळीने घेरलेल्या शेतकऱ्यांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST

वरकुटे-मलवडी : दुष्काळी परिस्थितीनंतर माण तालुक्यात सात वर्षांनी प्रथमच गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने हातातोंडाला आलेली शेतकऱ्यांची उभी पिके ...

वरकुटे-मलवडी : दुष्काळी परिस्थितीनंतर माण तालुक्यात सात वर्षांनी प्रथमच गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने हातातोंडाला आलेली शेतकऱ्यांची उभी पिके संततधार पावसाने वाया गेली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई, पीकविम्याचे पैसे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांंना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.

सदानकदा जानेवारी महिन्याच्या अखेरीस माण तालुक्यातील पूर्वेकडील भागात पाणीटंचाई जाणवते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होतात. पिके वाया जात होती. काही शेतकरी टँकरने पाणी देऊन पिके जगवत असायचे. मात्र गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली आणि काढणीला आलेली पिके मातीमोल झाली. शासनस्तरावरून तडकाफडकी पिकांचा पंचनामाही करण्यात आला. तेव्हापासून शेतकरी नुकसानभरपाई मिळेल या आशेवर आहे. नुकतीच शासनाच्या वतीने आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कागदावरची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. या अगोदर २०१८-१९मध्ये पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले. पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमाही उतरवला होता. तेव्हा शेतकऱ्यांच्या जळीत पिकांंचा ना पंचनामा झाला ना कंपनीकडून पीकविमा मिळाला. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची नुकसानभरपाई मिळाली नाही. बड्या-बड्या नेत्यांनी दिलेेेली आश्वासने ढगात विरून गेली. विमा कंपनीनेही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. तरीदेखील पुढच्याच वर्षी संबंधित कंपनीकडे पीकविमा भरा, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले.

चौकट :

कर्ज फेडायचे का नाही

सोसायटीचे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची मदत करण्याचे धोरण शासनाने आखले होते, त्याचेही शेतकऱ्यांना काही मिळाले नाही? मात्र कर्ज न भरणाऱ्यांना लाखो रुपयांचे कर्ज माफ झाले. यामुळे आत्ता मार्चअखेरीस कर्जफेड करायची का नाही, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे निर्माण झाला आहे. या सर्वांचा विचार करता शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना राजा म्हटले जाते; पण त्या राजाच्याच नावाने राजकारण करणारे, शेतीपूरक व्यवसाय करणारे व्यापारी मोठे झाले; शेतकरी मात्र आज ना उद्या शासनाकडून मोबदला मिळेल या भरवशावर दिवस काढीत आहेत.