शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

दुष्काळानंतर अवकाळीने घेरलेल्या शेतकऱ्यांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST

वरकुटे-मलवडी : दुष्काळी परिस्थितीनंतर माण तालुक्यात सात वर्षांनी प्रथमच गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने हातातोंडाला आलेली शेतकऱ्यांची उभी पिके ...

वरकुटे-मलवडी : दुष्काळी परिस्थितीनंतर माण तालुक्यात सात वर्षांनी प्रथमच गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने हातातोंडाला आलेली शेतकऱ्यांची उभी पिके संततधार पावसाने वाया गेली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई, पीकविम्याचे पैसे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांंना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.

सदानकदा जानेवारी महिन्याच्या अखेरीस माण तालुक्यातील पूर्वेकडील भागात पाणीटंचाई जाणवते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होतात. पिके वाया जात होती. काही शेतकरी टँकरने पाणी देऊन पिके जगवत असायचे. मात्र गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली आणि काढणीला आलेली पिके मातीमोल झाली. शासनस्तरावरून तडकाफडकी पिकांचा पंचनामाही करण्यात आला. तेव्हापासून शेतकरी नुकसानभरपाई मिळेल या आशेवर आहे. नुकतीच शासनाच्या वतीने आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कागदावरची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. या अगोदर २०१८-१९मध्ये पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले. पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमाही उतरवला होता. तेव्हा शेतकऱ्यांच्या जळीत पिकांंचा ना पंचनामा झाला ना कंपनीकडून पीकविमा मिळाला. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची नुकसानभरपाई मिळाली नाही. बड्या-बड्या नेत्यांनी दिलेेेली आश्वासने ढगात विरून गेली. विमा कंपनीनेही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. तरीदेखील पुढच्याच वर्षी संबंधित कंपनीकडे पीकविमा भरा, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले.

चौकट :

कर्ज फेडायचे का नाही

सोसायटीचे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची मदत करण्याचे धोरण शासनाने आखले होते, त्याचेही शेतकऱ्यांना काही मिळाले नाही? मात्र कर्ज न भरणाऱ्यांना लाखो रुपयांचे कर्ज माफ झाले. यामुळे आत्ता मार्चअखेरीस कर्जफेड करायची का नाही, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे निर्माण झाला आहे. या सर्वांचा विचार करता शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना राजा म्हटले जाते; पण त्या राजाच्याच नावाने राजकारण करणारे, शेतीपूरक व्यवसाय करणारे व्यापारी मोठे झाले; शेतकरी मात्र आज ना उद्या शासनाकडून मोबदला मिळेल या भरवशावर दिवस काढीत आहेत.