शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘कऱ्हाड जनता’च्या ठेवीदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST

कऱ्हाड : अवसायनात निघालेल्या कऱ्हाड जनता सहकारी बँकेतील ठेवीदारांना पाच लाखापर्यंत विम्याचे संरक्षण असणाऱ्या ठेवी परत देण्याची कार्यवाही सुरू ...

कऱ्हाड : अवसायनात निघालेल्या कऱ्हाड जनता सहकारी बँकेतील ठेवीदारांना पाच लाखापर्यंत विम्याचे संरक्षण असणाऱ्या ठेवी परत देण्याची कार्यवाही सुरू असून, आजअखेर ९० कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती उपनिबंधक व कऱ्हाड जनता बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी दिली. आत्तापर्यंत १२ हजार ७२ खातेदारांना विम्याचा लाभ दिला गेला आहे.

कऱ्हाड जनता सहकारी बँकेतील ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत देण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १,४५० ठेवीदारांचे ७ कोटी रुपये बँक ऑफ बडोदा येथे वर्ग करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सभासदांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. आजअखेर १२ हजार ७२ सभासदांच्या खात्यावर विम्याचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. विम्याची ही रक्कम ९० कोटी रुपये इतकी आहे. विमा संरक्षण असणाऱ्या ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३११ रुपयांची आर्थिक तरतूद विमा कंपनीकडून झाली आहे. जनता बँकेच्या खात्यावर हे पैसे वर्ग झाले आहेत. बँकेतील ४० हजार ४१५ ठेवीदारांनी क्लेमफॉर्म भरले आहेत. यातील ३९ हजार ३२ ठेवीदारांना ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३११ रुपये मिळणार आहेत. काही अर्जांमध्ये त्रुटी असल्याने केवायसी व अन्य कागदपत्रं घेऊन त्यांचे क्लेमफॉर्म नव्याने भरण्यात आले आहेत.

जनता बँकेचे एकूण ठेवीदार १ लाख ३३ हजार ४२१ आहेत. त्यापैकी ४० हजार ४१५ ठेवीदारांनी क्लेमफॉर्म दिले आहेत. यातील ३९ हजार ३२ ठेवीदारांचे क्लेमफॉर्म मंजूर झाले आहेत. क्लेमपोटी ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३११ रुपये प्राप्त झाले आहेत. ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. खातेदारांच्या देय रकमेपोटी आत्तापर्यंत १२३ कोटी रुपये बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. १५ हजार ५२२ सभासदांची नावे कळविण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील. ज्यांना पैसे मिळाले आहेत; पण रक्कम अपुरी आहे किंवा वारसांच्या खात्यावर पैसे वर्ग होण्यास अडचणी येत आहेत, याबाबत योग्य कार्यवाही करून त्यांना लाभ देण्यात येईल, असे मनोहर माळी यांनी सांगितले.