शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

व्याघ्रप्रकल्पग्रस्तांच्या अडचणींचा विचार

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

अजित पवार : कोयना नदीवरील संगमनगर धक्का पुलाचे भूमिपूजन

 सातारा : ‘सह्याद्रीच्या डोंगर रांगातील जनतेचे पायाभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबतच्या स्थानिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोयना नदीवर संगमनगर धक्का (ता. पाटण) येथे नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती संजय देसाई, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, सत्यजित पाटणकर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘पाटण तालुक्यात पावसाला चांगला प्रारंभ झाला आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र, राज्याच्या बऱ्याच भागात अद्यापही पावसाअभावी टंचाईचे संकट समोर आहे. भविष्यात पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. ऊस शेतीसाठी शंभर टक्के ठिबक सिंंचनाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही. कोयना धरणाच्या दोन्ही बाजंूकडून डोंगराच्या कडेने बंद पाईपलाईने कऱ्हाडपर्यंत सिंंचनासाठी पाणी नेण्याची आमदार पाटणकर यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी आश्वासक वक्तव्य केले.’ सह्याद्रीच्या डोंगर रांगातील दुर्मिळ तसेच औषधी वनस्पतींचे जतन झाले पाहिजे, अशी आपलीही भूमिका असल्याचे सांगून पवार म्हणाले, मात्र ज्या स्थानिक जंगलवासियांनी जंगल जपण्याचे काम केले. त्यांच्या हक्कांनाही बाधा येता कामा नये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्याबाबतीत वनखात्याच्या बंधनांचा विचार करताना स्थानिकांचाही काही बाबतीत सवलतीच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे. त्यासाठी व्यवहारीक भूमिका घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असेही ते म्हणाले. आमदार पाटणकर म्हणाले, ‘पावसाळ्यात पूर्वी तीन-चार महिने येथील जुन्या पुलावर पाणी राहत असल्यामुळे संपर्क तुटण्याचा प्रसंग वारंवार येत असे. आता या नवीन पुलाचे काम झाल्यानंतर ही अडचण येणार नाही. अशा प्रकारे पुढील ५० वर्षांचा विचार करुन पुलाचा आराखडा केला आहे. कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंत दोन्ही बाजूंनी बंद पाईपलाईने गुरुत्व पद्धतीने शेतीसाठी ठिकठिकाणी व्हॉल्व काढून पाणी दिल्यास नदीवरील लोकांच्या उपसासिंंचन योजनांचा विजेचा खर्च वाचेल. ’ यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार रवि सबनीस, गटविकास अधिकारी ए.ए. फडतरे, जे. एस. मोहिते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

३२ गावांचा प्रश्न मिटला ‘पूल मंजुरीबाबत प्रशासकीय मार्ग काढून या पुलासाठी सुमारे साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला आहे. संगमनगरच्या पलीकडील सुमारे ३२ गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वच घटकांचा यामुळे लाभ होणार आहे. शेतीसह व्यापारालाही चालना मिळून आर्थिक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.’