शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

व्याघ्रप्रकल्पग्रस्तांच्या अडचणींचा विचार

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

अजित पवार : कोयना नदीवरील संगमनगर धक्का पुलाचे भूमिपूजन

 सातारा : ‘सह्याद्रीच्या डोंगर रांगातील जनतेचे पायाभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबतच्या स्थानिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोयना नदीवर संगमनगर धक्का (ता. पाटण) येथे नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती संजय देसाई, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, सत्यजित पाटणकर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘पाटण तालुक्यात पावसाला चांगला प्रारंभ झाला आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र, राज्याच्या बऱ्याच भागात अद्यापही पावसाअभावी टंचाईचे संकट समोर आहे. भविष्यात पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. ऊस शेतीसाठी शंभर टक्के ठिबक सिंंचनाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही. कोयना धरणाच्या दोन्ही बाजंूकडून डोंगराच्या कडेने बंद पाईपलाईने कऱ्हाडपर्यंत सिंंचनासाठी पाणी नेण्याची आमदार पाटणकर यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी आश्वासक वक्तव्य केले.’ सह्याद्रीच्या डोंगर रांगातील दुर्मिळ तसेच औषधी वनस्पतींचे जतन झाले पाहिजे, अशी आपलीही भूमिका असल्याचे सांगून पवार म्हणाले, मात्र ज्या स्थानिक जंगलवासियांनी जंगल जपण्याचे काम केले. त्यांच्या हक्कांनाही बाधा येता कामा नये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्याबाबतीत वनखात्याच्या बंधनांचा विचार करताना स्थानिकांचाही काही बाबतीत सवलतीच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे. त्यासाठी व्यवहारीक भूमिका घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असेही ते म्हणाले. आमदार पाटणकर म्हणाले, ‘पावसाळ्यात पूर्वी तीन-चार महिने येथील जुन्या पुलावर पाणी राहत असल्यामुळे संपर्क तुटण्याचा प्रसंग वारंवार येत असे. आता या नवीन पुलाचे काम झाल्यानंतर ही अडचण येणार नाही. अशा प्रकारे पुढील ५० वर्षांचा विचार करुन पुलाचा आराखडा केला आहे. कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंत दोन्ही बाजूंनी बंद पाईपलाईने गुरुत्व पद्धतीने शेतीसाठी ठिकठिकाणी व्हॉल्व काढून पाणी दिल्यास नदीवरील लोकांच्या उपसासिंंचन योजनांचा विजेचा खर्च वाचेल. ’ यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार रवि सबनीस, गटविकास अधिकारी ए.ए. फडतरे, जे. एस. मोहिते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

३२ गावांचा प्रश्न मिटला ‘पूल मंजुरीबाबत प्रशासकीय मार्ग काढून या पुलासाठी सुमारे साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला आहे. संगमनगरच्या पलीकडील सुमारे ३२ गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वच घटकांचा यामुळे लाभ होणार आहे. शेतीसह व्यापारालाही चालना मिळून आर्थिक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.’