शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे मोगल : शिवतारे

By admin | Updated: March 9, 2016 01:06 IST

विरोधकांवर कडाडून टीका : पुसेगाव येथे व्यायामशाळेचे उद्घाटन; जिहे-कठापूर योजना दोन वर्षांत मार्गी लावणार

पुसेगाव : ‘सध्याच्या विरोधकांकडे जलसंधारण व जलसंपदा खात्याचा कारभार होता तर मग का त्या योजना पूर्णत्वाला गेल्या नाहीत. येरळा नदी पुनरुज्जीवन ही योजना युती शासनाची असून, याचे श्रेय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे आधुनिक मुगल जाणीवपूर्वक घेत असतील तर कदापीही सहन करणार नाही,’ असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी युती शासनाने सप्टेंबर १९९७ रोजी सुरू केलेली जिहे-कटापूर योजना आपल्याच सरकारच्या काळात येत्या दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने मंजूर केलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, शिवसेना पुरंदर तालुकाप्रमुख दिलीप यादव, पुसेगावच्या सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच रणधिर जाधव, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती.शिवतारे म्हणाले, ‘दुष्काळी भागातील नद्या, ओढे पुन्हा प्रवाही व्हावेत यासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार तसेच नद्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी सुमारे ४३ कोटींचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. पाण्याचे नैसर्गिकरीत्या विकेंद्रीकरण करून मोठे साठे तयार करण्यावर शासनाचा भर आहे. आमचे सरकार जनतेचे आहे. त्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत जाणीवपूर्वक जात नाही. विरोधात आवाज उठवणारा शिवसेना पक्ष कधीही सत्तेत येऊ नये यासाठी पक्षाची व कार्यकर्त्यांची गणना जातियवादी करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न या मंडळी कडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप पालकमंत्री शिवतारे यांनी केला.पुसेगाव हे जिल्ह्यात प्रख्यात गाव असून, तरुणांच्या संघटनेने यश मिळेलआणि विकास कामांना प्रारंभ केला जाईल. येणाऱ्या काळात अधिकाधिक निधी पुसेगावसाठी दिला जाईल. शासनाच्या माध्यमातून चाललेल्या प्रत्येक कामाचे श्रेय युती शासनाचे असून, ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केल्यानेच हे प्रश्न मार्गी लागले आहेत. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहून अभ्यासपूर्वक सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहावे. शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शिवतारे यांनी केले.उपसरपंच रणधिर जाधव म्हणाले, ‘या भागासाठी वरदान असणारी जिहे-कटापूर योजना तत्काळ मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावेत. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने नेर तलावातील गाळ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मोफत उचलून मिळावा. योगायोगाने पालकमंत्रीही याच गावचे सुपुत्र असल्याने पालकमंत्र्यांनी पुसेगावचे पालकत्व करून लोकांना न्याय द्यावा.’या कार्यक्रमाचे संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)