शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी माफीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

सातारा : पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सातारकरांना तीन महिने घरपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव ...

सातारा : पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सातारकरांना तीन महिने घरपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव नगरसविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. दरम्यान, घरपट्टी भरावी की न भरावी याबाबत नागरिकांमध्ये गुरुवारी गोंधळ उडाला. कर भरणा करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने नागरी सुविधा केंद्रात दिवसभर शुकशुकाट पसरला होता.

घरपट्टी हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. कोरोना कालावधीत अनेक व्यावसायिक व नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी निवासी व बिगर निवासी मिळकतींची घरपट्टी तीन महिने माफ करण्याचा ठराव पालिकेच्या सभेत मंजूर केला. शिवाय थकीत रकमेवरील व्याजातही १०० टक्के सूट मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे.

पालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. नागरिकांमधून या निर्णयाचे कौतुकही होत आहे. असे असले तरी पुढे उद्भवणाऱ्या अडचणींकडे प्रशासन व नागरिकांनी डोळेझाक करून चालणार नाही. वास्तविक घरपट्टी हा अ‍ॅडव्हान्स टॅक्स आहे. बिल मिळाल्यानंतर मिळकतदारांनी ठराविक कालावधीत कर जमा करणे क्रमप्राप्त आहे. हा कर माफ करण्याची कायद्यात कुठेही तरतूद नाही.

पालिकेच्या मागणीप्रमाणे राज्य शासनाने करमाफीचा प्रस्ताव मान्य केला तरी पालिकेने उत्पन्नाचे कोणते स्त्रोत निर्माण केले, नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा कशा पुरविल्या जाणार, पालिका खर्च-बचत कुठे करणार याची विचारणा शासनाकडून होऊ शकते. एकूणच तीन महिन्यांचा विचार केला तरी पालिकेचे तीन ते सव्वातीन कोटींचे उत्पन्न बुडू शकते. यामध्ये नगरपालिकेचे नुकसान तर आहेच शिवाय नागरिकांनाही याचा फटका बसू शकतो. नागरिकांनी वेळेत कर जमा न केल्यास थकबाकीवरील व्याज काही थांबणार नाही. नागरिकांना प्रतिमाह २ टक्के प्रमाणे व्याज भरावे लागणार आहे. एखाद्या मिळकतदारांने वर्षभर कर जमा न केल्यास त्याच्याकडून थकीत रकमेवर तब्बल २४ टक्के व्याज आकारले जाऊ शकते. प्रशासनाच्या या ठरावावर नगरविकास विभाग कोणता निर्णय घेते, हे पाहणे औत्स्तुक्याचे ठरणार आहे.

(चौकट)

थकबाकी नसणाऱ्यांचा लाभ

निवासी मिळकतींची घरपट्टी माफ करावी की न करावी याचा निर्णय नगरविकास विभाग घेणार आहे. मात्र, बिगर निवासी मिळकतींबाबतचा निर्णय पालिका प्रशासन स्थानिक पातळीवर घेऊ शकते. शहरात लाखो रुपये थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. अशा थकबाकीदांना तीन महिने घरपट्टी माफीचा लाभ कदापी मिळणार नाही. लाभ हवा असल्यास त्यांना थकबाकीची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. अशा मिळकदारांकडून पालिका यंदा संपूर्ण कर वसूल करणार असून, पुढील वर्षी तीन महिन्यांची रक्कम वजा करून दिली जाणार असल्याचे समजते.