शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सीईओंच्या सहीत तिन्ही भाषांचा संगम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

शालेय जीवनापासूनच सहीला सुरुवात होते. ही सहीच पुढे आपली ओळख बनते. सही साधी असली तरी ती दुसऱ्याला हुबेहूब करता ...

शालेय जीवनापासूनच सहीला सुरुवात होते. ही सहीच पुढे आपली ओळख बनते. सही साधी असली तरी ती दुसऱ्याला हुबेहूब करता येत नाही. अनेकांच्या सहीवर कुटुंबीयांचा प्रभाव असतो. तर काहीजण मित्रांबरोबर चर्चा करूनही सही कशी असावी, याचे प्रात्यक्षिक करतात. त्यात काय असावे, याची चर्चा होऊन सही गिरवली जाते. काहीजणांच्या सहीवर परिस्थितीचाही प्रभाव राहतो. बहुतांशी सहीत आडनाव लांब असते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या सहीत मराठी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांचा संगम पाहायला मिळतो.

पूर्वीच्या काळी हाताचा अंगठा महत्त्वाचा समजला जायचा. कोणतेही शासकीय काम करण्यास गेले की निरक्षर लोक डावा हात पुढे करून शाईमध्ये अंगठा बुडवून तो कागदावर उठवत. आता अंगठा उठविणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रत्येक घरात सुशिक्षित पिढी आहे. त्यामुळे मुले शाळेत जातात. दुसरी, चौथीपर्यंत शाळा शिकली तरी भाषा ज्ञान आलेले असते. त्यामुळे इंग्रजी नसली तरी मराठीत का असेना मोडकी तोडकी सही करता येते.

सही कशी असावी, याबाबत काही नियम नाही. कोणीही कशाही पद्धतीने ती करू शकतो. कोणाची मातृभाषेत असते तर कोणी इंग्रजीत करतो. पण, बहुतांशीजण हे इंग्रजीमध्येच सही करतात. यामध्ये आपल्या नावातील पाहिले स्पेलिंग घेतात. नंतर वडिलांच्या नावातील पाहिले स्पेलिंग असते. त्यानंतर आडनाव संपूर्ण लिहितात. यामध्ये आडनावच लांब राहते.

सहीची खरी सुरुवात शाळेपासून सुरू होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशावेळी काही मित्र एकत्र येऊन आपल्या सहीत काय काय असावे. त्यामध्ये काय दिसावे, अशी चर्चा करतात. त्यानंतर सही आकार घेते तर काहीजण घरातील लोकांची सही पाहतात. त्याप्रकारे ती करण्याचा प्रयत्न करतात. तसेच काहीवेळा पालकही मुलांना सही कशी असावी व करावी, याबद्दल मार्गदर्शन करतात. कधी शिक्षकही मुलांना सहीबद्दल माहिती देतात. त्यामुळे अनेकांच्या सहीवर मित्र, कुटुंबीय, शिक्षकांचा प्रभाव राहतो. मात्र, अनेकांच्या सहीवर परिस्थितीचा प्रभाव असतो, असेही सांगण्यात येते.

काहीजणांची सही साधी असते. घरातील लोक साधे, कष्टाळू असतात. परिस्थिती सामान्य असते. त्याचा परिणाम म्हणून अनेकांची सही एकदम साधी असते तसेच सहीप्रमाणे संबंधितांचा स्वभावही साधाच पाहायला मिळतो. अशी ही सहीच सर्वांची आयुष्यभराची ओळख बनून जाते.

चौकट :

सहीमध्ये गावाच्या नावाचे स्पेलिंग...

सही सुरुवातीला केली जाते तीच शेवटपर्यंत अनेकांची राहते. पण, काहीजण त्यामध्ये बदलही करतात. अधिक करून मुलींच्या सहीत बदल होतो. लग्नानंतर सहीत बदल केला जातो. तर काही पुरुषही सहीमध्ये बदल करतात. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पाच वर्षांपूर्वीपर्यंत सही वेगळी होती. त्यानंतर त्यांनी सहीत बदल केला. त्यांच्या सहीवर आई - वडिलांचा प्रभाव आहे. वडील कर्नाटक शासन सेवेत तर आई बँकेत होती. घरातील प्रभावात त्यांनी सहीला सुरुवात केली. आता त्यांच्या सहीत मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषा आहे. तसेच एका इंग्रजी स्पेलिंगमधून गावाचे नावही ते दर्शवितात.

सहीचा फोटो आहे... दिनांक ०५ सातारा सीईओ सही नावाने मेल आणि कोष्टी सर मोबाईलवर...

- नितीन काळेल