शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कृषियंत्र निर्मितीसाठी सामंजस्य करार!

By admin | Updated: December 13, 2015 22:48 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापूस वेचणी यंत्र विकासावर लक्ष केंद्रित केले असून, या यंत्रावर संशोधन करण्यात येत आहे.

जगदीश कोष्टी-- सातारा -=निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून विदर्भातील कैक शेतकरी फाशीचा दोर जवळ करत असल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे याच पट्ट्यातला बळीराजा आपला माल खपवण्यासाठी मोठ्या धाडसाने नवनवीन प्रांत हुडकू लागल्याचे आशादायक दृश्य आढळून आले आहे. नवी बाजारपेठ शोधण्यासाठी कोलंबसने जसा अमेरिकेत पाय ठेवला होता, अगदी तसेच विदर्भातील काही शेतकरीही स्वत:च्या शेतातील शेकडो टन संत्रे घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र बाजारपेठ तयार करू लागले आहेत. विशेष म्हणजे, त्यांचं दु:ख हलकं करण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांऐवजी अमरावतीची संत्री घेण्यास सातारकरही प्राधान्य देत आहेत.अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण संत्री उत्पादक शेतकरी योगेश गावंडे हे साहेबराव देशमुख यांच्यासमवेत सध्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकासमोरील बाजार समिती परिसरात संत्री विकण्यासाठी आले आहेत. गावंडे यांनी स्वत:च्या नऊ एकर जागेत संत्र्यांची बाग केली आहे. बागेच्या जागेवर व्यापाऱ्यांना अवघे नऊ ते दहा रुपये किलो दराने संत्री विकावी लागतात. या कमी दरात उत्पादन खर्चही निघत नाही. खर्च आणि उत्पन्न यांचं गणितं चुकलं की शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे गावंडे यांनी व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने न विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही दाखविली. सुमारे साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी सातारा गाठले आहे. भर उन्हात साताऱ्याच्या फूटपाथवर स्टॉल लावून हे दोघेही अमरावतीकर संत्री विकत आहेत. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील तेरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बचतगट तयार केला आहे. हा बचतगट शासनाच्या कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्पाला जोडला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना संत्री वाहतुकीसाठी लागणारा तीस टक्के खर्च दिला जाणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांमार्फतच एक पत्र त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले आहे. या पत्रात शेतकऱ्यांसाठी संत्री ठेवण्यासाठी गोडावून व विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे साताऱ्यातील काही स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध झाला मात्र त्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनीही कमी दराने संत्री विकण्यास सुरूवात केली आहे.तरी प्रशासकीय पातळीवर विदर्भाच्या शेतकऱ्यांना अभय मिळाले आहे. साताऱ्यातील अतिक्रमणे काढली जात असताना या शेतकऱ्यांना मात्र सूट मिळाली आहे. कऱ्हाड कृषी प्रदर्शनात १० टन विक्रीया शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी कऱ्हाड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात हजेरी लावली होती. त्याठिकाणी चक्क दहा टन संत्र्यांची विक्री झाली. तेव्हाच पश्चिम महाराष्ट्रात आपल्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळू शकेल, हे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वत:च संत्रा विक्रीची ठिकाणे निश्चित केली. विशेष म्हणजे, स्थानिक व्यापाऱ्यांनी कमी दराने विक्री सुरू केली असली तरी सातारकरांनी अमरावतीतील शेतकऱ्यांकडून संत्रे खरेदी करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. तेरा बचत गट कार्यरतसाताऱ्यात येण्यासाठी अमरावतीच्या तेरा शेतकऱ्यांनी बचत गट केला आहे. प्रत्येक शेतकरी दोन टन संत्री घेऊन येणार आहे. एकाची विक्री झाली की, दुसरा शेतकरी येणार आहे. तेराही शेतकऱ्यांना नंबर येऊन गेल्यानंतर पुन्हा पहिल्याचा नंबर येणार आहे. यामुळे प्रत्येकाला संधी मिळणार आहे.आमची कोणाशीही स्पर्धा नाही. केवळ जागेवर संत्री विकणे परवडत नसल्याने आम्ही साताऱ्यात आलेलो आहोत. सातारकरही आमच्या कष्टाला दाद देत विदर्भातल्या संत्र्याची आवर्जून खरेदी करत आहेत.- योगेश गावंडे, संत्री उत्पादक शेतकरी, वरुड, ता. अमरावती