शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अतिवृष्टीतील नुकसानभरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

सातारा : जिल्ह्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसात अतिवृष्टी झाली होती. त्यात नुकसानग्रस्त शेतीसह विहीर व घरांचे पंचनामे करण्यात आले ...

सातारा : जिल्ह्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसात अतिवृष्टी झाली होती. त्यात नुकसानग्रस्त शेतीसह विहीर व घरांचे पंचनामे करण्यात आले होते. त्याची नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने वेळेत भरपाई मिळाली तर त्याचा बळीराजाला आधार होणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीतील नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोविड नियमांचे पालन आवश्यक

सातारा : वाढत्या कोविड प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या जिल्हा पुन्हा लॉक झाला असून, संसर्ग साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या शासनाच्या सूचनांकडे गावकऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बाधित रुग्ण शहरी भागाच्या तुलनेत जास्त वाढत आहेत.

ओढा स्वच्छतेची मागणी

सातारा : येथील विसावा नाका परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिसरातील ओढ्याची स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नेहमी वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावरील कचरा उचलण्याची गरज आहे. कचरा साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. झाडाच्या फांद्या, प्लास्टिक व कचरा सिमेंट पाइपमध्ये अडकून ओढा तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने ओढ्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

फांद्यांनी फुटपाथ झाकोळला

सातारा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या पदपथावर लावण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने तोडण्याची मागणी होत आहे. संबंधित फांद्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतुकीला धोकादायक ठरणाऱ्या या फांद्या काढण्याची मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या

सातारा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्राधान्याने लसीकरण कररण्यात यावे. लसीकरणाचे काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अध्यक्ष तुषार निकम, कार्याध्यक्ष शहनाज शेख, सुनील खामकर, सुनील भोसले आदी उपस्थित होते.