शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

दळणवळणात होतेय शिक्षकांची चाळण

By admin | Updated: October 13, 2015 23:54 IST

प्रोत्साहनात्मक वेतनवाढ रद्द केल्याने उत्साहच संपला

शाळाबाह्य गुरुजी : तीन प्रगती जाधव-पाटील --सातारा : नोकरीच्या दुर्गम ठिकाणी विद्यादानाचे काम करण्यासाठी जाणाऱ्या अनेक शिक्षकांच्या शरीराची दुखणी या दळणवळणाने वाढविली आहेत. दुर्गम भागात काम करून अतिउत्कृष्ट सेवेचा मान मिळवून शासनाचे कौतुक पदरी पाडून घ्यायचे म्हटले तरी ते अशक्य असल्याने शिक्षकांमध्ये काम करण्याचा उत्साह दिसेनासा झाला आहे. शासनाने शिक्षण हक्क कायदा केला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, असे निकष लावले गेले. त्याबरोबरच शाळेतही भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अघोषितपणे शिक्षकावरंच येऊन पडले. स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि अध्ययनाबरोबरच अशैक्षणिक कामांचे ओझे पेलणाऱ्या शिक्षकांची पाचावर धारण बसली आहे. नोकरी करवतही नाही आणि सोडवतही नाही, अशी अवस्था सध्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची झाली आहे.राज्य शासनाने अनेक योजना शिक्षकांसाठी आणल्या होत्या; पण वेळोवेळी शिक्षक विरोधी जाणाऱ्या धोरणांचा आता शिक्षकांनाही उबग आला आहे. लोकांच्या मुलांना शिकविण्यासाठी आपल्या मुलांवर होणारे अन्याय, नोकरीसाठी परगावी जावे लागत असल्यामुळे प्रवासातूनहोणाऱ्या चिडचिडीचा परिणाम कुटुंबावरही होत आहे. जिल्ह्यातील साठ टक्क्यांहून अधिक शिक्षक प्रवास करणारे आहेत. दळणवळणाच्या सुविधांची आबाळ असल्यामुळे अनेक शिक्षकांना दुचाकीवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे घरी येईपर्यंत कुटुंबीय चिंतेत असतात. या सोयी झाल्या कायमच्या बंददेशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांना पावलोपावली प्रोत्साहन देता यावे म्हणून सलग पाच वर्षे अतिउत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जायचा. गोपनीय अहवालाच्या आधारावर शिक्षकांची निवड केली जायची. त्यात यशस्वी होणाऱ्या शिक्षकाला दोन वेतनवाढी मिळायच्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये अतिशय निकोप पध्दतीने गुणवत्तापूर्ण स्पर्धा व्हायची. गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद झाली आहे.ज्या शिक्षकांना राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात, त्यांना मिळणारी विशेष वेतनवाढही थांबविण्यात आली आहे.कुटुंबातील कोणी आजारी असेल तर त्याचा विमा पूर्वी शासनाच्या वतीने केला जात होता. त्यामुळे निर्धारित दवाखान्यांमध्ये औषधोपचार मोफत केले जात होते. आता आधी खर्च करा आणि मग बिले जोडा असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक शिक्षकांना या खर्चाची प्रतिपूर्ती अद्याप मिळालीच नाही. शिक्षक हक्क कायद्याचा सोयीनुसार लावला गेलेला अर्थ, शिक्षक संघटनांची श्रेयवादासाठी चाललेली धडपड, प्रत्येक शैक्षणिक धोरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा वाढलेला ओघ, खासगी शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, प्रयोगशीलतेसाठी सतत बदलत जाणारे शैक्षणिक धोरण, शिक्षक भरती व बदली धोरणातील बदल पटसंख्येतील गळती यामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यात निर्माण होत असलेली दरी दूर करण्यासाठी प्रशासन, पर्यवेक्षण आणि समाज या घटकांनी शिक्षकाचे मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. - सुनील खंडाईत, शिरगाव, जि.प. शाळा, कऱ्हाड