शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

दळणवळणात होतेय शिक्षकांची चाळण

By admin | Updated: October 13, 2015 23:54 IST

प्रोत्साहनात्मक वेतनवाढ रद्द केल्याने उत्साहच संपला

शाळाबाह्य गुरुजी : तीन प्रगती जाधव-पाटील --सातारा : नोकरीच्या दुर्गम ठिकाणी विद्यादानाचे काम करण्यासाठी जाणाऱ्या अनेक शिक्षकांच्या शरीराची दुखणी या दळणवळणाने वाढविली आहेत. दुर्गम भागात काम करून अतिउत्कृष्ट सेवेचा मान मिळवून शासनाचे कौतुक पदरी पाडून घ्यायचे म्हटले तरी ते अशक्य असल्याने शिक्षकांमध्ये काम करण्याचा उत्साह दिसेनासा झाला आहे. शासनाने शिक्षण हक्क कायदा केला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, असे निकष लावले गेले. त्याबरोबरच शाळेतही भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अघोषितपणे शिक्षकावरंच येऊन पडले. स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि अध्ययनाबरोबरच अशैक्षणिक कामांचे ओझे पेलणाऱ्या शिक्षकांची पाचावर धारण बसली आहे. नोकरी करवतही नाही आणि सोडवतही नाही, अशी अवस्था सध्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची झाली आहे.राज्य शासनाने अनेक योजना शिक्षकांसाठी आणल्या होत्या; पण वेळोवेळी शिक्षक विरोधी जाणाऱ्या धोरणांचा आता शिक्षकांनाही उबग आला आहे. लोकांच्या मुलांना शिकविण्यासाठी आपल्या मुलांवर होणारे अन्याय, नोकरीसाठी परगावी जावे लागत असल्यामुळे प्रवासातूनहोणाऱ्या चिडचिडीचा परिणाम कुटुंबावरही होत आहे. जिल्ह्यातील साठ टक्क्यांहून अधिक शिक्षक प्रवास करणारे आहेत. दळणवळणाच्या सुविधांची आबाळ असल्यामुळे अनेक शिक्षकांना दुचाकीवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे घरी येईपर्यंत कुटुंबीय चिंतेत असतात. या सोयी झाल्या कायमच्या बंददेशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांना पावलोपावली प्रोत्साहन देता यावे म्हणून सलग पाच वर्षे अतिउत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जायचा. गोपनीय अहवालाच्या आधारावर शिक्षकांची निवड केली जायची. त्यात यशस्वी होणाऱ्या शिक्षकाला दोन वेतनवाढी मिळायच्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये अतिशय निकोप पध्दतीने गुणवत्तापूर्ण स्पर्धा व्हायची. गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद झाली आहे.ज्या शिक्षकांना राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात, त्यांना मिळणारी विशेष वेतनवाढही थांबविण्यात आली आहे.कुटुंबातील कोणी आजारी असेल तर त्याचा विमा पूर्वी शासनाच्या वतीने केला जात होता. त्यामुळे निर्धारित दवाखान्यांमध्ये औषधोपचार मोफत केले जात होते. आता आधी खर्च करा आणि मग बिले जोडा असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक शिक्षकांना या खर्चाची प्रतिपूर्ती अद्याप मिळालीच नाही. शिक्षक हक्क कायद्याचा सोयीनुसार लावला गेलेला अर्थ, शिक्षक संघटनांची श्रेयवादासाठी चाललेली धडपड, प्रत्येक शैक्षणिक धोरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा वाढलेला ओघ, खासगी शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, प्रयोगशीलतेसाठी सतत बदलत जाणारे शैक्षणिक धोरण, शिक्षक भरती व बदली धोरणातील बदल पटसंख्येतील गळती यामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यात निर्माण होत असलेली दरी दूर करण्यासाठी प्रशासन, पर्यवेक्षण आणि समाज या घटकांनी शिक्षकाचे मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. - सुनील खंडाईत, शिरगाव, जि.प. शाळा, कऱ्हाड