शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

गॅस्ट्रोच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: November 27, 2014 23:58 IST

राम हंकारे यांचे मत --थेट संवाद

प्रश्न : गॅस्ट्रोची जिल्ह्यात नेमकी कधी आणि कशामुळे सुरुवात झाली?उत्तर : ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ नाही, विशेषत: मिरजेमध्ये याची साथ आलेली आहे. १९ नोव्हेंबर रोजी महापालिकेने सर्व्हे केला. यामध्ये रुग्ण आढळून आले. तसे आॅगस्टपासून रुग्ण आढळत गेले. गॅस्ट्रो हा मुळात दूषित पाण्यामुळे होतो. मैलामिश्रित पाण्याच्या वापराने याची सुरुवात होते. त्यानंतर एकमेकाच्या संपर्काने ही साथ सुरु होते. महापालिका क्षेत्रातही पिण्याची पाईपलाईन व ड्रेनेज पाईपलाईन जवळजवळ असल्यानेच दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने ही साथ आली आहे.प्रश्न : गॅस्ट्रो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत? उत्तर : मुळात दूषित पाण्यापासून कसे दूर राहता येईल, हे पाहिले पाहिजे. पाणी उकळून, थंड करुन पिले पाहिजे. पाण्याला दुर्गंधी येत असेल तर, तात्काळ त्या पाण्याचा वापर टाळला पाहिजे. केवळ नळालाच नव्हे, तर घरामध्येही पाणी दूषित होऊ शकते. शौचास जाऊन आल्यानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात ठेवले पाहिजे. दहा लिटर पाण्यात दोन थेंब मेडिक्लोर औषध टाकून पाणी पिले पाहिजे. बाहेरील, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. प्रश्न : गॅस्ट्रो झाल्यानंतर काय उपाययोजना कराव्यात? उत्तर : रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे. अर्थात ते उकळून थंड केलेले असले पाहिजे. लिंबाचे सरबत वेळोवेळी घेतले पाहिजे. शरीरातील पाणी संपणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. ओआरएस पावडर मिळसून पाणी घेतले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करुन घेतला पाहिजे. सलाईन घेतले पाहिजे. यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा राहणार नाही. प्रश्न : आपल्याकडे सध्या गॅस्ट्रोची स्थिती कशी आहे? उत्तर : ग्रामीण भागात गॅस्ट्रो नाही. महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रो आहे, मात्र तो नियंत्रणात आहे. महापालिका क्षेत्रातील गॅस्ट्रोबाबत बोलण्याचा अधिकार मला नाही. मात्र गॅस्ट्रोवर नियंत्रण आणणे ही सामूहिक जबाबदारी आहे. यामध्ये महापालिका आरोग्य यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवक, इंडियन मेडिकल असोसिएशन आदी सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. सामूहिक प्रयत्नांशिवाय यावर नियंत्रण येणार नाही. जनजागृतीही व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. लोकांमधील गैरसमजही दूर करायला हवेत. लोकांमधील भीती दूर केली पाहिजे. इतर आजारांमुळेही रुग्ण आपल्याला गॅस्ट्रो झाल्याची भीती सध्या बाळगत आहेत. त्यामुळे ही भीती दूर करुन गॅस्ट्रोची लक्षणे आणि उपाययोजना याबाबतही व्यापक जनजागृती झाली पाहिजे. प्रश्न : गॅस्ट्रोवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करीत आहे? उत्तर : ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. पाणवठे शुध्दीकरणाचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. शुध्दीकरण पावडरीची मात्रा वाढवली आहे. महापालिकेला आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक दिले आहे. मी स्वत: यावर देखरेख करीत आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाला पुरेसा औषधसाठा जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आला आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेच्या मागणीप्रमाणे डॉक्टर, कर्मचारी, औषध साठ्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गॅस्ट्रोची साथ रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. औषधांची मागणी झाल्यास तात्काळ पुरवली जाणार आहे. गॅस्ट्रोच्या नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. प्रश्न : नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? उत्तर : हा प्रश्न स्वच्छतेशी निगडित आहे. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. घरामध्ये पाणी दूषित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शौचालय स्वच्छ राहील, त्याचा पिण्याच्या पाण्याशी संबंध येणार नाही, अशी दक्षता घेतली पाहिजे. ४अंजर अथणीकर महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. पाचशे रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. प्रशासनाने तीन रुग्ण दगावल्याची कबुली दिली असली तरी, प्रत्यक्षात आकडा अधिक आहे. गॅस्ट्रो कशामुळे होतो, तो होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहेत, झालेल्यांनी काय उपाय करावेत, ही साथ रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करीत आहे, आदीविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्याशी ‘लोकमत’ने गुरुवारी साधलेला संवाद...