शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

युतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

आनंदराव पाटील : जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत टीकास्त्र

सातारा : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी शासनाने घेतलेल्या राबविलेल्या योजनांची नावे बदलून मोदी व फडणवीस सरकारने देशातील व महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला असून, युती सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका आमदार आनंदराव पाटील यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युती शासनाच्या कारभाराविरोधात शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, महाप्रदेश महिला काँगे्रस सरचिटणीस रजनी पवार, बाबासाहेब कदम, प्रमोद देशमाने, प्रल्हाद चव्हाण, मोहन भोसले, साहेबराव जाधव, राजाराम काळे, शिवाजीराव फडतरे, अशोकराव पाटील, भगवानराव आवाडे, नरेश देसाई, विजय भिलारे, धैर्यशील सुपले, रवींद्र झुटिंग, उमेश ताटे, राहुल घाडगे, डॉ. शंकरराव पवार, जितेंद्र भोसले, जयकुमार शिंदे, अमित जाधव, नंदकुमार निकम, सर्जेराव जांभाळे, जिल्हा महिला काँगे्रसच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, कोरेगाव महिला काँगे्रसच्या अध्यक्षा संजना जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. आनंदराव पाटील म्हणाले, ‘या देशातील जनतेने मोठ्या अपेक्षेने मोदी-फडणवीस सरकारला निवडून दिले; परंतु केंद्रात व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन सहा महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी, थेट भरीव आर्थिक मदत, ऊसदराची समस्या आदी गंभीर प्रश्न आदी विषयांवर मोदी फडणवीस सरकारने जनतेचा मोठा विश्वासघात केला आहे. अशा दगाबाज सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.’ ैअसेही पाटील म्हणाले. रवींद्र झुटिंग यांनी स्वागत केले. धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ताटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)