शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

युतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

आनंदराव पाटील : जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत टीकास्त्र

सातारा : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी शासनाने घेतलेल्या राबविलेल्या योजनांची नावे बदलून मोदी व फडणवीस सरकारने देशातील व महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला असून, युती सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका आमदार आनंदराव पाटील यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युती शासनाच्या कारभाराविरोधात शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, महाप्रदेश महिला काँगे्रस सरचिटणीस रजनी पवार, बाबासाहेब कदम, प्रमोद देशमाने, प्रल्हाद चव्हाण, मोहन भोसले, साहेबराव जाधव, राजाराम काळे, शिवाजीराव फडतरे, अशोकराव पाटील, भगवानराव आवाडे, नरेश देसाई, विजय भिलारे, धैर्यशील सुपले, रवींद्र झुटिंग, उमेश ताटे, राहुल घाडगे, डॉ. शंकरराव पवार, जितेंद्र भोसले, जयकुमार शिंदे, अमित जाधव, नंदकुमार निकम, सर्जेराव जांभाळे, जिल्हा महिला काँगे्रसच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, कोरेगाव महिला काँगे्रसच्या अध्यक्षा संजना जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. आनंदराव पाटील म्हणाले, ‘या देशातील जनतेने मोठ्या अपेक्षेने मोदी-फडणवीस सरकारला निवडून दिले; परंतु केंद्रात व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन सहा महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी, थेट भरीव आर्थिक मदत, ऊसदराची समस्या आदी गंभीर प्रश्न आदी विषयांवर मोदी फडणवीस सरकारने जनतेचा मोठा विश्वासघात केला आहे. अशा दगाबाज सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.’ ैअसेही पाटील म्हणाले. रवींद्र झुटिंग यांनी स्वागत केले. धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ताटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)