शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यात ढगाळ वातावरण; पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

ढगाळ वातावरणामुळे पाले भाज्यांच्या पिकांवर किडीचा प्रादूर्भाव रानं तयार पण पावसाचाच पत्ता नाही लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : ...

ढगाळ वातावरणामुळे पाले भाज्यांच्या पिकांवर किडीचा प्रादूर्भाव

रानं तयार पण पावसाचाच पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कऱ्हाड तालुक्यात शेतकऱ्याने पेरणीसाठी मशागत करून राने तयार केली असली तरी अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असल्यामुळे पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी मे महिन्यापूर्वीच शेतातील मशागतीची कामे पूर्ण करतात. अशाच पद्धतीने या वर्षीही मशागतीची कामे लवकर आटोपून शेतकरी पेरणीसाठी तयार झाले होते. त्यातच तालुक्यात पुणे-बंगळूर महामार्गामुळे शेतीची दोन भागांत विभागणी होते. महामार्गाच्या पूर्वेकडील भागात बागायती शेती करण्याची पध्दत वेगळी आहे, तर पश्चिमेकडील भागात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या भागातील शेती करण्याची पद्धत वेगळी आहे. पश्चिमेकडील भागात परंपरागत शेती पद्धतीनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धात धूळवाफेवरच पेरण्या करण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा विचारात घेता पारंपरिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. असे असतानाही आजही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवरच पेरणी करतात. अशा पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते. बहुतांशी शेतकरी समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करतात.

पूर्वेकडील भागात बागायती शेती असल्यामुळे सरी सोडून टोकणी पध्दतीने शेती करण्याची परंपरा आहे. बागायती शेतीत शेतकरी अंतर्गत पिके टोकण पद्धतीने करतात. ऊस लागणही शेताला पाणी पाजून केली जाते. मात्र, अंतर्गत पीक टोकणी ही पावसाच्या ओलीवरच करण्यात येते. त्यानुसार शेतकऱ्यांची मशागतीची कामे मे महिन्यातच पूर्ण झाली आहेत. मात्र, पावसाळा सुरू होऊन १० दिवस उलटले तरी पावसाने दडी मारली असल्यामुळे पूर्वेकडील भागात सरी सोडून शेतकरी टोकणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहे. तर पश्चिमेकडील धूळवाफेवर पेरणी केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत.

तालुक्यातील मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय भाज्याही घेतल्या जातात. भेंडी, गवारी, घेवडा यासारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्यांवर किडीचा प्रादर्भाव वाढला आहे.