शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

परिपत्रक निघाले; पण समितीचे काय?

By admin | Updated: January 21, 2015 23:55 IST

शिक्षण विभाग : महिला तक्रार निवारण कक्ष स्थापना; सविस्तर माहिती कोणालाच नाही

सातारा : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्था, शाळांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यासंबंधी परिपत्रक काढले असले तरी ही समिती कशी तयार करायची, त्यामध्ये कोणाला घ्यायचे, याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे शाळांना सूचना देऊन काय-काय सांगायचे? असा प्रश्न आता शिक्षण विभागातील अनेकांना पडला आहे.महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व उपाययोजना सुचविण्याबाबत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रत्येक शाळेत महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. तसेच न्यायालय स्तर, गावपातळी, शाळा, महाविद्यालय स्तर, औद्योगिक आस्थापनामध्ये महिलांकरिता तक्रार निवारण समिती स्थापन करणे अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, अध्यापक विद्यालये, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या नुकत्याच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासंबंधी परिपत्रक संबंधितांना पाठविण्यात आले आहे. निवृत्त न्यायमूर्ती धर्माधिकारी समितीच्या शिफारशी विचारात घेऊन प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन्याबाबत पाठपुरावा करावा, असेही त्यामध्ये सांगण्यात आले आहे. पण, त्यामध्ये याबाबत सविस्तर अशी काहीच माहिती नाही.शाळांत महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करायचा झाला, तर तो कसा असेल. त्याचा अध्यक्ष कोण, सचिव, सदस्य कोण असतील. कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती त्यामध्ये असतील, असा कोणताही उल्लेख त्यामध्ये नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला परिपत्रक मिळाले असले तरी महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागाने या कक्षाच्या स्थापनेबाबत सविस्तर माहिती देणे महत्त्वाचे आहे. तरच हे कक्ष तयार करताना अडचणी येणार नाहीत. याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडून याबाबत परिपत्रक आले आहे. त्याप्रमाणे आम्ही शाळांना सूचना देत आहोत; पण समिती कशी तयार करायची याची माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे महिला तक्रार निवारण कक्ष लवकर सुरू करावा, असे शासनाने सांगितले असले तरी सविस्तर माहिती काहीच नसल्याने समिती तयार करताना किंवा झाल्यावर यावर बराच ऊहापोह होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)