शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

शिरवळमध्ये रसायन कंपनीला आग

By admin | Updated: April 3, 2015 23:57 IST

४0 कोटींचे नुकसान : दहा तासांनंतर नियंत्रण

शिरवळ : येथील जुन्या औद्योगिक वसाहतीतील एका रसायननिर्मितीच्या कंपनीला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये ३५ ते ४० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग एवढी भीषण होती की, शेजारच्या कंपनीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. नऊ अग्निशमन बंब, सात खासगी टँकरच्या मदतीने दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविता आले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत सुभाष सिपी यांच्या मालकीची सिपी पॉलिमुरेमिन्स ही रंगांची रसायने तयार करणारी कंपनी आहे. कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या बॅरलच्या गोदामाला गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले.मात्र, गोदामामध्ये मोठा साठा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. कंपनीत ठेवलेल्या बॅरलचे स्फोट होऊ लागले. स्फोटांमुळे बॅरल आकाशात उंच फेकले जात होते. त्यामुळे त्यांचे अवशेष घटनास्थळापासून एक ते दोन किलोमीटरपर्यंत जाऊन पडत होते. आगीची माहिती मिळताच शिरवळ व खंडाळ्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खंडाळा मदत पथकाच्या मदतीने परिसरातील इतर कंपनीतील कामगारांना बाहेर काढत परिसर निर्मनुष्य केला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, तहसीलदार शिवाजी तळपे घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीच कात्रज, पुणे येथील अग्निशमन बंब सर्वांत प्रथम दाखल झाला. त्यानंतर कोल्हापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, हिंजवडी औद्योगिक वसाहत, फलटण, सातारा, म्हसवड, सासवड येथील अग्निशमन दलांचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागले. रात्रीची वेळ व सोसाट्याचा वारा यामुळे आग भडकत होती. तसेच रसायनाच्या बॅरलचे स्फोट वाढत होते. त्यामुळे आग विझविताना अडचणी येत होत्या. बंबांसाठी इतर कंपन्यांनी त्यांच्याकडील मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिल्याने पहाटे सहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र, सातनंतर पुन्हा आग भडकू लागली. त्यानंतर सकाळी नऊला आग पूर्णपणे विझली. (प्रतिनिधी) अनेकांनी गाव सोडलेआगीचे लोळ पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दहा ते वीस किलोमीटरपर्यंत दिसत होते. यावेळी आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने शिरवळ व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांनी गाव सोडणे पसंत केले.आगीची तीव्रता मोठी असतानाही कंपनीच्या व्यवस्थापनातील अधिकारी, सुरक्षारक्षक अथवा मालक तेथे उपस्थित नव्हते. प्रशासनाला मदत करण्याऐवजी लांब थांबून पाहणेच त्यांनी पसंत केले. सुरक्षारक्षकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला.अग्निशमनच्या जवानांचे धाडसशेजारच्या कंपन्यांनाही आगीची झळ पोहोचत होती. तेथून जवळच असलेल्या कंपनीत डिझेलचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मोठा अनर्थ ओढावू शकला असता. मात्र, कात्रज व हिंजवडीच्या अग्निशमन दलातील जवानांनी आगीची झळ तिथंपर्यंत पोहोचू न देताच आग आटोक्यात आणली. दोषींवर कारवाई : जिल्हाधिकारीशिरवळ येथील कंपनीला लागलेल्या आगीबाबत वाईच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.श