शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

चेक निघाले खोटे; भूमिपुत्राचे हेलपाटे!

By admin | Updated: July 25, 2014 22:14 IST

मोरणा भागातील प्रकार : पवनचक्की कंपन्यांकडून फसवणूक

अरुण पवार - पाटण शेतकऱ्यांच्या जमिनी काबीज करून त्यावर पवनचक्की टॉवर उभारणी केली. पवनचक्क्यांचे साहित्य नेणारी वाहने गुंडाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून नेण्यात आली. या बदल्यात नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेश तीन महिने होऊन गेले तरी वटले नाहीत. आता मात्र, पवनचक्क्यांचे प्रतिनिधी आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार सारख्या राज्यात जाऊन बसले आहेत. फसवणूक झालेला शेतकरी मात्र पवनचक्क्यांची ओसाड पडलेली कऱ्हाड, पाटण येथील कार्यालयांमध्ये चकरा मारतोय. पोलिसांकडे देखील जातोय. गोकुळ तर्फ पाटण व काहीर गावांच्या शेतकऱ्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतोय. चेक वटला नाही म्हणून पोलिसांकडे गेले असता आधीच अशा तक्रार आमच्याकडे आल्या आहेत. त्यातच पवनचक्क्यांचे प्रतिनिधी बाहेरच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यांना कुठे शोधायचे अशी उत्तरे मिळतात. मात्र, हेच खाकी वर्दीवाले पवनचक्की कंपन्यांची वाहने सुरक्षित डोंगरावर पोहोचविण्यासाठी त्यांच्याच गाडीत बसून संरक्षण देताना मोरणा परिसरातील अनेकांनी पाहिले आहे. मग बोगस धनादेश दिला म्हणून पवनचक्की कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधीवर कारवाई का होत नाही ? असा सवाल विचारला जात आहे. पवनचक्की प्रतिनिधींचे फोन बंद वीजनिर्मिती करणारे पवनचक्क्यांचे पाती कोणत्या दिशेला फिरवायची, वाऱ्याची दिशा व वेग कसा आहे, या सर्वांचे नियंत्रण सातारा, पुणे यासारख्या ठिकाणी असणाऱ्या पवनचक्की कंपन्यांच्या कार्यालयातून होते. त्यामुळे कंपन्यांचे प्रतिनिधी डोंगर पठारावर येत नाहीत. आणि आले तर कधी येतात अन् पटकन निघून जातात, ते समजत नाही. मोबाईल बंद ठेवले जातात, अशी तक्रार शेतकरी करीत आहे. तुटपुंज्या पगाराची नोकरी पवनचक्क्यांचे टॉवर उभे राहिले ते शेतकऱ्यांच्या जमिनीतच. या टॉवरमधून आता वीजनिर्मिती सुरू झाली आहे. या टॉवरची देखभाल करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांची मुले वॉचमन म्हणून तुटपुंज्या पगारावर राबत आहे. तो पगारदेखील सहा महिने मिळाला नाही, अशी तक्रार ड्युटी करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.