शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महाप्रसाद तपासा; परवान्याची सक्ती नको

By admin | Updated: August 19, 2014 23:44 IST

गणेशोत्सव : नागरिकांच्या आरोग्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सहकार्याची तयारी

सागर गुजर - सातारा  --गणेशोत्सवामध्ये भाविकांना देण्यात येणाऱ्या महाप्रसादावर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे. अन्नदान करण्याआधी ‘एफडीए’ (अन्न व औषध प्रशासन) चा रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. यावर शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एफडीए ने महाप्रसाद तपासावा, त्यानंतरच तो भाविकांना दिला जाईल. मात्र, परवान्याची सक्ती करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना परवाने बंधनकारक होते. मात्र, उत्सव साजरा करताना काही ठिकाणी विषबाधेचेही प्रकार घडले. सुदैवाने सातारा शहरात अशी एकही घटना आजतागायत घडलेली नाही. याबाबत साताऱ्यातील कार्यकर्ते अधिक दक्ष असतात. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यानुसार उत्सवांतील अन्नदान करताना अन्न व औषध विभागाचे परवाने सक्तीचे करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवातील इतर परवान्यांप्रमाणेच अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घेणेही आवश्यक करण्यात आले आहे. मंडळांना आधीच वेगवेगळे परवाने काढण्याची सक्ती प्रशासनाने केली आहे. महाप्रसाद करताना काटेकोरपणे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. जी मंडळे महाप्रसाद देणार आहेत. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन अन्नाची तपासणी केल्यास ते सोयीचे होईल, असे काही मंडळांचे पदाधिकारी सांगतात. आरोग्याच्या दृष्टिने निर्णयाचे स्वागत होत आहे. महाप्रसादात लाडूसह फ्रूटखंडही सातारा शहरात गणेशोत्सवासह गणेश जयंती, महाशिवरात्री, नवरात्रोत्सव, हनुमान जयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांतर्फे महाप्रसाद दिला जातो. लाडू, शिरा, बुंदी, गव्हाची खिर, दूध, मलई यासोबत स्विट डिश, फू्रट सॅलिड, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ जेवणात दिले जातात. नागरिकांना महाप्रसादाचा आनंद मिळावा, या चांगल्या उद्देशाने भारुन ही मंडळी अन्नदान करत असतात. जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांमध्ये होणाऱ्या महाप्रसादाची गुणवत्ता आम्ही नेहमीच तपासतो. अन्न व सुरक्षा मानदे कायदा नव्याने अमलात आल्याने आता सर्वच उत्सवांतील महाप्रसादासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. - रामलिंग बोडके, सहायक आयुक्त, एफडीए गणेशोत्सवाच्या महाप्रसादामध्ये हजारो लोक जेवण करत असतात. दूधापासून बनविलेल्या पदार्थांतून विषबाधा होण्याची शक्यता असते. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिने हा निर्णय योग्य वाटतो. मंडळाने याला सहकार्य करावे. - रवींद्र पवार, नगरसेवक उत्सवांमध्ये प्रशासनाकडून अनेक परवान्यांची सक्ती केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादाच्या ठिकाणी येऊन अन्नाची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घेणे मंडळांना अवघड जात आहे. - राजू गोडसे, सप्ततारा मंडळ