शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

उत्तरमांड नदीचे पात्र बदलले

By admin | Updated: June 18, 2014 01:27 IST

घरांना धोका : संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

चाफळ : अतिवृष्टीकाळात चाफळ विभागातील उत्तरमांड नदीपात्रास अनेकदा महापुर येवुन राम मंदिरानजिक गावाच्या मध्यभागी असणारा फरशी पुल सतत पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीचे पात्र दक्षिण बाजुस सरकू लागले असुन नदीकाठावरील रामपेठेतील सुमारे २२ घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने निधिसाठी पाठपुरावा करुन संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे. चाफळला राम मंदिरामुळे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणुन चाफळला ओळखले जाते. येथील डी. बी. वेल्हाळ हे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन तर राजेश पवार पंचायत समिती सदस्य म्हणुन विभागाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, या दोन्ही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्यास कोणीही धजवत नाही. नदीकाठावरील सुमारे २२ घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. मंदिरापासुन जवळच बसस्थानक असुन मंदिरासमोरील रामपेठेमध्ये अनेक व्यवसायिकांनी लहान-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. अतिवृष्टीकाळात या व्यावसायीकांच्या दुकानामध्ये पाणी जावुन नुकसान झाले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला फक्त भाडे वसुली पुरती या व्यवसायिकांची आठवण होते. यापुर्वी नदीचे पात्र उत्तर बाजूस होते. मात्र कालांतराने पाण्याच्या मोठया प्रवाहामुळे नदीपात्रात बदल होवून पात्र दक्षिण बाजूस सरकले. अतिवृष्टीकाळात पुराचे पाणी घरांना वेढा देवू पाहत असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेवुन रहावे लागत आहे. (वार्ताहर)