शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दिसला चौक...टाक भाजी मंडई !

By admin | Updated: June 13, 2015 00:28 IST

नोकरदारांचा वेळ हेरून व्यवसाय : चौकाचौकांमध्ये भरू लागलीय भाजी मंडई

दत्ता यादव - सातारा--दिवसेंदिवस शहराचा विस्तार अगदी झपाट्याने वाढत आहे. पूर्वी एखादी छोटी वस्तू घ्यायची म्हटली तरी उपनगरातील नागरिकांना शहरात यावे लागत होते; परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या गरजा ओळखून अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय थाटले. त्यापैकीच एक म्हणजे रोजच्या जेवणातील भाजी होय. शहरातील चौकाचौकांमध्ये सध्या भाजी मंडई भरली असल्याचे दिसून येत आहे. नोकरदारांचा वेळ आणि भाजी विक्रीतून होणारी उलाढाल मोठी असल्यामुळे सध्या भाजी विक्री व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. त्यामुळे अगदी शहराच्या उपनगरातही सकाळ आणि संध्याकाळ भाजी मंडईतील किलबील ऐकायला मिळत आहे. शहरामध्ये प्रामुख्याने तीन भाजी मंडई आहेत. रविवार पेठ, महात्मा फुले,आणि जुना मोटार स्टॅन्ड भाजी मंडईचा त्यामध्ये समावेश आहे. या मंडईमध्ये खरेदीसाठी विशेषत: रविवार आणि गुरुवारी गर्दी होते. त्यामुळे इतर दिवशी या मंडई अक्षरश: ओस पडतात. त्यामुळे केवळ दोनच दिवस व्यवसाय होत असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांनी शहर व उपनगरातील मुख्य चौकाचे ठिकाण हेरले. चौकाच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यात भाजी विक्रीस बसलो तर चांगला व्यवसाय होणार, हे माहीत असलेल्या विक्रेत्यांनी शहरातील असा कोणताच चौक सोडला नाही. मोळाचा ओढा, राधिका टॉकिज, बसस्थानक परिसर, समर्थ मंदिर, सीटी पोस्ट कार्यालय, पोवई नाका, गोडोली नाका, भूविकास बँक, जुना आरटीओ कार्यालय, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी सध्या भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने भाजी विक्रीकडे पर्यायी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. शहरात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा उपनगरात मिळणाऱ्या भाज्यांचे दरही दुपटीने असतात. पंचवीस रुपये किलो दराने मिळणारे कांदे उपगनराच्या चौकातील भाजीमंडईत ३५ ते ४० रुपये किलोने विकले जात आहेत. उपगनरात राहणारा बहुतांशवेळा कामगार वर्ग असतो. सायंकाळी कामावरून आल्यानंतर शहरात जाण्यापेक्षा जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.जागेवरून वादावादीचे प्रसंगकाही ठिकाणी चौकात भाजी विक्रीस बसण्यावरून अनेकदा विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. स्थानिक नगरसेवक किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरून चौकामध्ये जागा मिळविली जाते. एखादा नवखा विक्रेता त्या ठिकाणी आल्यास त्याला हुसकावून लावले जाते. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीला चौकामध्ये भाजी विक्रीस जागा मिळते.शहारातील मंडईमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही. तेथे सगळी वशिलेबाजी आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शहराच्या बाहेरील चौकात भाजी विक्रीला बसावे लागत आहे. येथेही आम्ही जी काही पालिकेची रोजची पावती आहे, त्याची रक्कम भरतो. या ठिकाणी तरी आम्हाला सुखाने व्यवसाय करू द्या, अशी आमची अपेक्षा आहे.- संपत गायकवाड (भाजी विक्रेता, मोळाचा ओढा)वाहतुकीची कोंडी नित्याचीचचौकाचौकांमध्ये भाजी मंडई भरू लागल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. काहीवेळेला छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मंडई विक्रीस धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांना बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. मात्र, ज्या त्या परिसरातील नागरिकांनी आपापल्या चौकातील सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.