शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

दिसला चौक...टाक भाजी मंडई !

By admin | Updated: June 13, 2015 00:28 IST

नोकरदारांचा वेळ हेरून व्यवसाय : चौकाचौकांमध्ये भरू लागलीय भाजी मंडई

दत्ता यादव - सातारा--दिवसेंदिवस शहराचा विस्तार अगदी झपाट्याने वाढत आहे. पूर्वी एखादी छोटी वस्तू घ्यायची म्हटली तरी उपनगरातील नागरिकांना शहरात यावे लागत होते; परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या गरजा ओळखून अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय थाटले. त्यापैकीच एक म्हणजे रोजच्या जेवणातील भाजी होय. शहरातील चौकाचौकांमध्ये सध्या भाजी मंडई भरली असल्याचे दिसून येत आहे. नोकरदारांचा वेळ आणि भाजी विक्रीतून होणारी उलाढाल मोठी असल्यामुळे सध्या भाजी विक्री व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. त्यामुळे अगदी शहराच्या उपनगरातही सकाळ आणि संध्याकाळ भाजी मंडईतील किलबील ऐकायला मिळत आहे. शहरामध्ये प्रामुख्याने तीन भाजी मंडई आहेत. रविवार पेठ, महात्मा फुले,आणि जुना मोटार स्टॅन्ड भाजी मंडईचा त्यामध्ये समावेश आहे. या मंडईमध्ये खरेदीसाठी विशेषत: रविवार आणि गुरुवारी गर्दी होते. त्यामुळे इतर दिवशी या मंडई अक्षरश: ओस पडतात. त्यामुळे केवळ दोनच दिवस व्यवसाय होत असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांनी शहर व उपनगरातील मुख्य चौकाचे ठिकाण हेरले. चौकाच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यात भाजी विक्रीस बसलो तर चांगला व्यवसाय होणार, हे माहीत असलेल्या विक्रेत्यांनी शहरातील असा कोणताच चौक सोडला नाही. मोळाचा ओढा, राधिका टॉकिज, बसस्थानक परिसर, समर्थ मंदिर, सीटी पोस्ट कार्यालय, पोवई नाका, गोडोली नाका, भूविकास बँक, जुना आरटीओ कार्यालय, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी सध्या भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने भाजी विक्रीकडे पर्यायी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. शहरात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा उपनगरात मिळणाऱ्या भाज्यांचे दरही दुपटीने असतात. पंचवीस रुपये किलो दराने मिळणारे कांदे उपगनराच्या चौकातील भाजीमंडईत ३५ ते ४० रुपये किलोने विकले जात आहेत. उपगनरात राहणारा बहुतांशवेळा कामगार वर्ग असतो. सायंकाळी कामावरून आल्यानंतर शहरात जाण्यापेक्षा जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.जागेवरून वादावादीचे प्रसंगकाही ठिकाणी चौकात भाजी विक्रीस बसण्यावरून अनेकदा विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. स्थानिक नगरसेवक किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरून चौकामध्ये जागा मिळविली जाते. एखादा नवखा विक्रेता त्या ठिकाणी आल्यास त्याला हुसकावून लावले जाते. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीला चौकामध्ये भाजी विक्रीस जागा मिळते.शहारातील मंडईमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही. तेथे सगळी वशिलेबाजी आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शहराच्या बाहेरील चौकात भाजी विक्रीला बसावे लागत आहे. येथेही आम्ही जी काही पालिकेची रोजची पावती आहे, त्याची रक्कम भरतो. या ठिकाणी तरी आम्हाला सुखाने व्यवसाय करू द्या, अशी आमची अपेक्षा आहे.- संपत गायकवाड (भाजी विक्रेता, मोळाचा ओढा)वाहतुकीची कोंडी नित्याचीचचौकाचौकांमध्ये भाजी मंडई भरू लागल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. काहीवेळेला छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मंडई विक्रीस धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांना बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. मात्र, ज्या त्या परिसरातील नागरिकांनी आपापल्या चौकातील सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.