शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

चाफेश्वराच्या मंदिरामुळं नकाशावर आलं चाफळ!

By admin | Updated: March 15, 2015 00:15 IST

समर्थांचे वास्तव्य : राम मंदिरालाही आहे वेगळा इतिहास

हणमंत यादव ल्ल चाफळ तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरास पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चाफळ गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आपणास आजमितिस पाहावयास मिळत आहे. मात्र चाफळ या नावामागची कहाणी काही वेगळीच आहे. येथील उत्तरमांड नदीपात्रामध्ये साधारणत: १२०० वर्षांपूर्वीचे एक हेमाडपंथी बांधकाम केलेले पुरातन महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरास पूर्वी चाफेश्वर मंदिर म्हणून ओळखले जायचे. त्याकाळी या मंदिराच्या परिसरात ४५ ब्राह्मण व काही मराठी कुटुंबे वास्तव्य करत होती. यातील शहाणे कुटुंबीय या मंदिराची देखभाल करत होते. मात्र आश्चर्य वाटेल की, या ४५ कुटुंबाच्या वस्तीस स्वत:चे असे नावच नव्हते. कालांतराने येथील चाफेश्वर मंदिरामुळे या वस्तीस चाफळ म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही हे मंदिर सुस्थित असून, ते शिवकालीन इतिहासाची दिमाखात साक्ष देत आहे. समर्थ रामदास स्वामी हे भटकंती करत असताना त्यांनी चाफळच्या स्मशानभूमीत स्थानिक लोकांच्या मदतीने १६४८ मध्ये श्रीराम मंदिराची उभारणी केली. व खऱ्या अर्थाने चाफळच्या मंदिरात श्रीरामाचा उत्सव सुरू झाला. त्याकाळात पुढे छत्रपती शिवाजी महाराज व समर्थांची शिगंणवाडी परिसरात प्रथमच भेट झाली. या भेटीदरम्यान छत्रपती शिवरायांनी समर्थांच्या कार्यास हातभार म्हणून ३३ गावे, ४१९ बिघे जमीन व एक कुरण सनद म्हणून श्रीरामाच्या सेवेसाठी दान म्हणून दिली होती. याची नोंद श्रीराम मंदिराच्या आवारातील फलकावर पाहावयास मिळते. पुढे समर्थांनी मिळालेल्या सनदेतून त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामींच्यावर स्थानिकांचा सहभाग घेऊन श्रीरामाची पूजा, अर्चा, सेवा करण्याची जबाबदारी सोपवली होती. गंगाधर स्वामींनीही बंधूंचा आदेश माणून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी गंगाधर स्वामींनी सेवेत सामील असलेल्या प्रत्येक कुळास उदरनिर्वाहासाठी जमिनी कसण्यास दिल्या होत्या. आजही या जमिनी श्रीराम स्वामी संस्थानच्या नावे असून, सातवी पिढी आज या जमिनी कसताना दिसत आहेत. यानंतर इ. स. १९६७- ६८ च्या काळात पूर्वीच्या श्रीराम मंदिरास भूकंपाने तडे गेल्याने त्या जागेवर मुंबईचे उद्योगपती दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांनी स्वखर्चाने सध्याच्या श्रीराम मंदिराची स्थानिकांच्या सहकार्याने उभारणी केली. १९७४ च्या दरम्यान याठिकाणी श्रीराम देवस्थान ट्रस्टची उभारणी करण्यात आली. व २०११ साली या मंदिरास शासनाचा तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला.