शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

अकरावी प्रवेशासाठी सीईटी पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्या. दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाचा स्तर काय, याची माहिती होण्यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्याने याद्वारे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून कोविडने थैमान घातल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यातच विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुलांनी ऑनलाइन अभ्यास केला असला तरीही त्यांना त्यातील किती ज्ञान मिळाले, हे पाहण्यासाठी परीक्षा हे एकमेव मापदंड होते. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढल्याने शासनाने दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, अकरावी प्रवेश कसे करायचे, आदी प्रश्न अनेकांना पडले होते. शिक्षण विभागाने सीईटीच्या परीक्षेसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मक कौल दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणते विषय निवडावेत, यासह कमी आकलन झालेल्या विषयाकडे पुन्हा एकदा लक्ष देणे शक्य होणार आहे.

सीईटी तरी घेणार कशी?

कोरोना महामरीच्या काळात परीक्षेचे आयोजन कसे करावे, हा प्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. याबरोबरच सीईटी किती गुणांची घ्यायची, त्यात कोणत्या विषयांचा समावेश करायचा, बहुपर्यायी प्रश्नांसाठी पुन्हा नव्याने प्रश्नपत्रिका काढणे या सर्वच बाजूंनी हा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे सीईटी घ्यावी, या बाजूने कौल दिला गेला असला तरीही त्याच्या अंमलबजावणीवरही बारकाईने काम करण्याची गरज आहे.

कोट :

दहावीची परीक्षा यंदा झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अकरावीत कोणत्या शाखेत प्रवेश द्यावा, याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वच विषय समाविष्ट असलेली सीईटी घ्यायला काहीच हरकत नाही. शाळा त्यादृष्टीनेही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेऊ शकेल.

- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस

मुलांचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे सीईटीचा पर्याय उपयुक्त ठरेल. नवीन शिक्षण धोरणात बारावीला महत्त्व दिले आहे. त्यामुळे जी मुले दहावीत ज्या शाळेत होते, त्याच शाळेत राहतील, शाळांना अकरावीच्या तुकड्या द्याव्यात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न निकाली निघेल.

- राजेंद्र चारेगे, गुjुकुल स्कूल

शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांना आपले मत नोंदवता आले नाही. विषय फक़्त अकरावी प्रवेशाचा नसून पॉलिटेक्निकचे, आयटीआय या प्रवेशासाठीही पर्याय शोधणे आवश्यक आहे. सीईटी ऑफलाइन घेतली म्हणजे पुन्हा परीक्षेसाठीची यंत्रणा राबविणे आले, कोविड काळात हे जमणे शक्य वाटत नाही.

- अमित कुलकर्णी, विद्यापीठ काउन्सिल सदस्य

अंतर्गत मूल्यमापन कसे करणार?

प्रत्येक विद्यार्थ्याची आवड आणि शैक्षणिक कल वेगवेगळा असतो. त्यामुळे दहावीनंतर त्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा, याची थोडक्यात कल्पना प्राप्त गुणांमधून येऊ शकते. शास्त्र शाखेत जाणाऱ्याला विज्ञान आणि गणिताची गती अपेक्षित असते. सरसकट मूल्यमापन झाल्यामुळे विद्यार्थ्याला कुठे जायचे आहे? कशात गती आहे? हेच समजायला मार्ग शिल्लक राहणार नाही. परिणामी, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाखाली भलत्याच शाखेत प्रवेश घेऊन शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.