शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

अकरावी प्रवेशासाठी सीईटी पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्या. दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाचा स्तर काय, याची माहिती होण्यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्याने याद्वारे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून कोविडने थैमान घातल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यातच विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुलांनी ऑनलाइन अभ्यास केला असला तरीही त्यांना त्यातील किती ज्ञान मिळाले, हे पाहण्यासाठी परीक्षा हे एकमेव मापदंड होते. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढल्याने शासनाने दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, अकरावी प्रवेश कसे करायचे, आदी प्रश्न अनेकांना पडले होते. शिक्षण विभागाने सीईटीच्या परीक्षेसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मक कौल दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणते विषय निवडावेत, यासह कमी आकलन झालेल्या विषयाकडे पुन्हा एकदा लक्ष देणे शक्य होणार आहे.

सीईटी तरी घेणार कशी?

कोरोना महामरीच्या काळात परीक्षेचे आयोजन कसे करावे, हा प्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. याबरोबरच सीईटी किती गुणांची घ्यायची, त्यात कोणत्या विषयांचा समावेश करायचा, बहुपर्यायी प्रश्नांसाठी पुन्हा नव्याने प्रश्नपत्रिका काढणे या सर्वच बाजूंनी हा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे सीईटी घ्यावी, या बाजूने कौल दिला गेला असला तरीही त्याच्या अंमलबजावणीवरही बारकाईने काम करण्याची गरज आहे.

कोट :

दहावीची परीक्षा यंदा झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अकरावीत कोणत्या शाखेत प्रवेश द्यावा, याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वच विषय समाविष्ट असलेली सीईटी घ्यायला काहीच हरकत नाही. शाळा त्यादृष्टीनेही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेऊ शकेल.

- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस

मुलांचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे सीईटीचा पर्याय उपयुक्त ठरेल. नवीन शिक्षण धोरणात बारावीला महत्त्व दिले आहे. त्यामुळे जी मुले दहावीत ज्या शाळेत होते, त्याच शाळेत राहतील, शाळांना अकरावीच्या तुकड्या द्याव्यात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न निकाली निघेल.

- राजेंद्र चारेगे, गुjुकुल स्कूल

शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांना आपले मत नोंदवता आले नाही. विषय फक़्त अकरावी प्रवेशाचा नसून पॉलिटेक्निकचे, आयटीआय या प्रवेशासाठीही पर्याय शोधणे आवश्यक आहे. सीईटी ऑफलाइन घेतली म्हणजे पुन्हा परीक्षेसाठीची यंत्रणा राबविणे आले, कोविड काळात हे जमणे शक्य वाटत नाही.

- अमित कुलकर्णी, विद्यापीठ काउन्सिल सदस्य

अंतर्गत मूल्यमापन कसे करणार?

प्रत्येक विद्यार्थ्याची आवड आणि शैक्षणिक कल वेगवेगळा असतो. त्यामुळे दहावीनंतर त्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा, याची थोडक्यात कल्पना प्राप्त गुणांमधून येऊ शकते. शास्त्र शाखेत जाणाऱ्याला विज्ञान आणि गणिताची गती अपेक्षित असते. सरसकट मूल्यमापन झाल्यामुळे विद्यार्थ्याला कुठे जायचे आहे? कशात गती आहे? हेच समजायला मार्ग शिल्लक राहणार नाही. परिणामी, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाखाली भलत्याच शाखेत प्रवेश घेऊन शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.