शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटी पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील किती ज्ञात प्राप्त होते, हे पाहण्यासाठी असलेल्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्या. दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाचा स्तर काय, याची माहिती होण्यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्याने याद्वारे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून कोविडने थैमान घातल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यातच विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुलांनी ऑनलाइन अभ्यास केला असला तरीही त्यांना त्यातील किती ज्ञान मिळाले, हे पाहण्यासाठी परीक्षा हे एकमेव मापदंड होते. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढल्याने शासनाने दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, अकरावी प्रवेश कसे करायचे, आदी प्रश्न अनेकांना पडले होते. शिक्षण विभागाने सीईटीच्या परीक्षेसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मक कौल दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणते विषय निवडावेत, यासह कमी आकलन झालेल्या विषयाकडे पुन्हा एकदा लक्ष देणे शक्य होणार आहे.

सीईटी तरी घेणार कशी?

कोरोना महामरीच्या काळात परीक्षेचे आयोजन कसे करावे, हा प्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. याबरोबरच सीईटी किती गुणांची घ्यायची, त्यात कोणत्या विषयांचा समावेश करायचा, बहुपर्यायी प्रश्नांसाठी पुन्हा नव्याने प्रश्नपत्रिका काढणे या सर्वच बाजूंनी हा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे सीईटी घ्यावी, या बाजूने कौल दिला गेला असला तरीही त्याच्या अंमलबजावणीवरही बारकाईने काम करण्याची गरज आहे.

कोट :

दहावीची परीक्षा यंदा झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अकरावीत कोणत्या शाखेत प्रवेश द्यावा, याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वच विषय समाविष्ट असलेली सीईटी घ्यायला काहीच हरकत नाही. शाळा त्यादृष्टीनेही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेऊ शकेल.

- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस

मुलांचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे सीईटीचा पर्याय उपयुक्त ठरेल. नवीन शिक्षण धोरणात बारावीला महत्त्व दिले आहे. त्यामुळे जी मुले दहावीत ज्या शाळेत होते, त्याच शाळेत राहतील, शाळांना अकरावीच्या तुकड्या द्याव्यात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न निकाली निघेल.

- राजेंद्र चारेगे, गुjुकुल स्कूल

शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांना आपले मत नोंदवता आले नाही. विषय फक़्त अकरावी प्रवेशाचा नसून पॉलिटेक्निकचे, आयटीआय या प्रवेशासाठीही पर्याय शोधणे आवश्यक आहे. सीईटी ऑफलाइन घेतली म्हणजे पुन्हा परीक्षेसाठीची यंत्रणा राबविणे आले, कोविड काळात हे जमणे शक्य वाटत नाही.

- अमित कुलकर्णी, विद्यापीठ काउन्सिल सदस्य

अंतर्गत मूल्यमापन कसे करणार?

प्रत्येक विद्यार्थ्याची आवड आणि शैक्षणिक कल वेगवेगळा असतो. त्यामुळे दहावीनंतर त्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा, याची थोडक्यात कल्पना प्राप्त गुणांमधून येऊ शकते. शास्त्र शाखेत जाणाऱ्याला विज्ञान आणि गणिताची गती अपेक्षित असते. सरसकट मूल्यमापन झाल्यामुळे विद्यार्थ्याला कुठे जायचे आहे? कशात गती आहे? हेच समजायला मार्ग शिल्लक राहणार नाही. परिणामी, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाखाली भलत्याच शाखेत प्रवेश घेऊन शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.