शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी

By admin | Updated: July 8, 2015 23:28 IST

पृथ्वीराज चव्हाण : मलकापूर येथील कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांवर टीका

मलकापूर : ‘राज्याचे राजकारण सध्या कोणत्या दिशेला जात आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. बहुमताची सत्ता मिळालेल्या भाजप सरकारमधील भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे सरकार दिशाहीन बनत असल्याचे चित्र असून, राज्यकर्त्यांकडून मूलभूत विचारालाच तडा जात आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी,’ अशी मुख्य मागणी विधिमंडळात करणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. मलकापूर, ता. कऱ्हाड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, राजेंद्र मुळक, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, ‘कितीही स्थित्यंतरे झाली तरी योग्य विचाराला साथ देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा इतिहास आहे. राजकारणात बदल हे तर होतच असतात; मात्र योग्य विचाराला जनता योग्यवेळी नेहमीच साथ देते. मात्र विद्यमान सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, हे विशेष. हवामान बदलामुळे सध्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मराठवाडा तर पूर्णपणे कोरडाच आहे. पावसावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. पर्याय म्हणून त्यासाठी नवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. आघाडी शासनात आम्ही दहा लाख जनावरांना चारा छावणीच्या माध्यमातून चारा पुरवला होता. तर पाच हजार पाचशे टँकरने दुष्काळी भागात पाणी पुरवठा केला होता. अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला होता. पण सध्याचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने एकही सकारात्मक निर्णय घेण्याचे औदार्यही दाखवित नाही, ही बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांचे व जनतेचे हे सर्व प्रश्न घेऊन येणाऱ्या अधिवेशनात शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ (प्रतिनिधी)विधिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आघाडी शासनाच्या काळात आम्ही प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो. नेमके आज ते चित्र उलटे झाले आहे. जनतेची दिशाभूल करून निवडून आलेल्या सरकारने आजपर्यंत कोणतीही मदत दिलेली नाही. हे सरकार पूर्णपणे दिशाहीन आहे. या दिशाहीन सरकारच्या विरोधात आगामी काळात विधिमंडळात काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केले.