सातारा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर येळ्ळूर गावात महाराष्ट्राचा उल्लेख असलेला फलक कर्नाटकातील अधिकाऱ्यांनी बंदोबस्तात हटविल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. मराठी भाषिकांनी निदर्शने केली. त्यानंतर कर्नाटकच्या पोलिसांनी सरसकट मराठी माणसांना मारहाण आणि अटकसत्र सुरू केले. ही दृश्ये दूरचित्रवाणीवर पाहून महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कर्नाटक पोलिसांनी केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेली ही कारवाई नसून, मराठीद्वेषापोटी सुरू केलेली दंडेली आहे, अशा प्रतिक्रिया साताऱ्यातूनही उमटत आहेत. यासंदर्भात विविध क्षेत्रांतील आणि वयोगटांतील लोकांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.
कर्नाटकी पोलिसांच्या दंडेलीबद्दल संताप!
By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST