शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातील पायऱ्या सर्व्हेत गायब...

By admin | Updated: December 17, 2015 22:54 IST

सातारा : सदरबझारमधील नागरिक काम बंद पाडण्याच्या पवित्र्यात

सातारा : सदर बझार येथील कण्हेर उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दर्गा जवळील पुलालगत असलेल्या कालव्यातील दोन्ही बाजूंच्या पायऱ्या मुकादमाच्या सर्व्हेत नसल्याने दुरुस्तीत त्या गायब झाल्या आहेत. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावर संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांनी काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. येथील सदर बझारमधील दर्गा पुलापासून लक्ष्मी टेकडीपर्यंत कालवा दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या गळती बद्दल दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम मुकादमाच्या देखरेखीखाली सुरू आहे. यावेळी येथील दोन्ही बाजंूच्या पायऱ्या काढून प्लास्टर करण्यात आले. ही बाब काही महिलांनी संबंधितांना सांगितली.परंतु त्याकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर सदर बझार येथील काही नागरिकांनीही या पायरी विषयी विचारले असता मुकादमाने सांगितले की मी जवळ पास १९८० सालापासून या कालव्याचा सर्व्हे करत असून, या ठिकाणी पायऱ्याच नव्हत्या. त्यामुळे नागरिकही चांगलेच चक्रावले. त्यानंतर नागरिकांनी पायऱ्या असल्याचे पुरावे दाखवण्यास संमती दाखवली असता मुकादमाने संबंधित कार्यालयात व ठेकेदाराला फोन करून हात वर केले.पायऱ्याबाबत झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु याला कोणीही जुमानत नसल्याने एकमेकाकडे टोलवा-टोलवी सुरू होती. शेवटी नागरिकांनी काम बंद पाडण्याचा इशारा देताच पायऱ्या करण्याचे आश्वासन दिले गेले. दरम्यान, या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता कालव्याच्या सुरुवातीपासून पायऱ्या करण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा देखील येथील नागरिकांना होत आहे. उन्हाळ्यात अगदी वापरण्यासाठी पाणी देखील या कालव्यातून नागरिक घेत असतात. जनावरेही पाणी पिण्यासाठी याच पायऱ्याचा वापर करत असतात. त्यामुळे मुकादमाने केलेला हा सर्व्हे किती योग्य आहे. याची शहानिशा करावी असेही नागरिकांनी ठेकेदाराला सांगितले. (प्रतिनिधी)अखेर चूक मान्य...पायऱ्या विषयी वाद सुरू असताना नागरिकांनी ‘लोकमत’ कार्यालयात फोन केला. कालव्याचे फोटो काढताच ठेकेदार आणि मुकादमाने आपली चूक मान्य केली, आणि येथे पायऱ्या करून देतो असे आश्वासन देऊ लागले. पायऱ्यासाठी अर्ज द्यामुकादमाने लावलेल्या फोनवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पायऱ्या बांधू पण तुम्ही आम्हाला अर्ज द्या. यावर नागरिकांनी अर्ज कशासाठी असा प्रश्न केला. पूर्वीपासूनच येथे पायऱ्या आहेत. त्यामुळे अर्ज देण्याचा संबंधच नाही. पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी दोन्ही बाजूने पायऱ्या ठेवाव्यात असे नागरिकांनी ठणकाविले.