शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नीरा कालव्यावरून अधिकाऱ्यांसोबत ‘कालवा’

By admin | Updated: June 2, 2016 01:06 IST

तहसीलदारांच्या दालनात वादावादी : पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण : नीरा उजवा कालव्याचे आवर्तन चुकीचे झाल्याचा आरोप करीत तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता सिद्धमल, उपअभियंता बडबडे यांना फैलावर घेतले. दरम्यान, या नियोजनास आपण स्वत: जबाबदार नसून ‘कालवा समिती’चा हा निर्णय असल्याची लेखी कबुली सिद्धमल यांनी दिलीे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथे तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. यावेळी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे महेंद्र बेडके, सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव फडतरे आदी उपस्थित होते. ‘जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत वेळोवेळी हे आवर्तन चुकीचे ठरणार आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. सद्य परिस्थितीत हा प्रकार जरी योग्य वाटत असला तरी ऐन उन्हाळ्यात मात्र याचे गंभीर परिणाम होणार असल्याची कल्पनाही आपण दिली होती. सलग दोन आवर्तने देऊ नये, असेही सुचविले होते. मात्र, तरीही ही आवर्तने आपण का सोडलीत? कोणाच्या सांगण्यावरून सोडलीत? तुमचा बोलवता धनी कोण आहे? याचे उत्तर आम्हाला मिळालेच पाहिजे,’ असे सवाल करीत रणजितसिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘नीरा उजवा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन कोणी चुकवले?’ असा सवाल उपस्थितांनी सिद्धमल यांना केला. दरम्यान, रणजितसिंह यांनी ‘नीरा उजवा कालवा समितीचा हा निर्णय असेल तर तसेच आम्हाला लेखी लिहून द्या,’ असे सांगितले व यास सिद्धमल तयारही झाले. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातून नीरा उजवा कालवा जात असतानाही या भागातील बागायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. धरणात हक्काचे पाणी शिल्लक असताना उसाची पिके जळून जातात, यामागे तालुक्यातील कारखानदारी मोडकळीस आणण्याचा डाव दिसत आहे. ज्यांनी हे प्रयत्न केले आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत. अन्यथा दि. ६ रोजी तहसील कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.’ (प्रतिनिधी) ‘कमिन्स’च्या पाण्यावरून रणकंदन ‘नीरा उजवा कालव्यावरून सायफनद्वारे कमिन्स कंपनी पाणी नेत आहे, यास अधिकृत परवानगी आहे का?’ असे नानासाहेब इवरे यांनी विचारले. सिद्धमल यांनी ‘परवानगी नसेल तर कमिन्सवर कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट केले. तेव्हा, ‘कमिन्सचे पाणी बंद करा व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्या,’ असे रणजितसिंह यांनी सांगितले. यावर ‘आपण उद्या स्वत: कमिन्स कंपनीस भेट देऊन पाहणी करणार असून, तत्काळ पंचनामा करून कारवाई केली जाईल,’ असे सिद्धमल यांनी स्पष्ट केले. ‘मात्र संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पाणी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी इवरे यांनी शेवटी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या : ४दुष्काळी भागातील ऊस, डाळिंब व इतर खरिपाच्या पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावेत. ४एकरी ८० टन ऊस उत्पादन गृहीत धरून एफआरपीप्रमाणे शासनाने पीक विमा व नैसर्गिक आपत्ती योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. ४डाळिंबासाठी एकरी ४ लाख रुपये उत्पादन गृहीत धरून ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत. ४शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत. ४नीरा उजवा कालवा समिती बरखास्त करावी. ४पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.