शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

नीरा कालव्यावरून अधिकाऱ्यांसोबत ‘कालवा’

By admin | Updated: June 2, 2016 01:06 IST

तहसीलदारांच्या दालनात वादावादी : पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण : नीरा उजवा कालव्याचे आवर्तन चुकीचे झाल्याचा आरोप करीत तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता सिद्धमल, उपअभियंता बडबडे यांना फैलावर घेतले. दरम्यान, या नियोजनास आपण स्वत: जबाबदार नसून ‘कालवा समिती’चा हा निर्णय असल्याची लेखी कबुली सिद्धमल यांनी दिलीे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथे तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. यावेळी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे महेंद्र बेडके, सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव फडतरे आदी उपस्थित होते. ‘जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत वेळोवेळी हे आवर्तन चुकीचे ठरणार आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. सद्य परिस्थितीत हा प्रकार जरी योग्य वाटत असला तरी ऐन उन्हाळ्यात मात्र याचे गंभीर परिणाम होणार असल्याची कल्पनाही आपण दिली होती. सलग दोन आवर्तने देऊ नये, असेही सुचविले होते. मात्र, तरीही ही आवर्तने आपण का सोडलीत? कोणाच्या सांगण्यावरून सोडलीत? तुमचा बोलवता धनी कोण आहे? याचे उत्तर आम्हाला मिळालेच पाहिजे,’ असे सवाल करीत रणजितसिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘नीरा उजवा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन कोणी चुकवले?’ असा सवाल उपस्थितांनी सिद्धमल यांना केला. दरम्यान, रणजितसिंह यांनी ‘नीरा उजवा कालवा समितीचा हा निर्णय असेल तर तसेच आम्हाला लेखी लिहून द्या,’ असे सांगितले व यास सिद्धमल तयारही झाले. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातून नीरा उजवा कालवा जात असतानाही या भागातील बागायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. धरणात हक्काचे पाणी शिल्लक असताना उसाची पिके जळून जातात, यामागे तालुक्यातील कारखानदारी मोडकळीस आणण्याचा डाव दिसत आहे. ज्यांनी हे प्रयत्न केले आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत. अन्यथा दि. ६ रोजी तहसील कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.’ (प्रतिनिधी) ‘कमिन्स’च्या पाण्यावरून रणकंदन ‘नीरा उजवा कालव्यावरून सायफनद्वारे कमिन्स कंपनी पाणी नेत आहे, यास अधिकृत परवानगी आहे का?’ असे नानासाहेब इवरे यांनी विचारले. सिद्धमल यांनी ‘परवानगी नसेल तर कमिन्सवर कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट केले. तेव्हा, ‘कमिन्सचे पाणी बंद करा व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्या,’ असे रणजितसिंह यांनी सांगितले. यावर ‘आपण उद्या स्वत: कमिन्स कंपनीस भेट देऊन पाहणी करणार असून, तत्काळ पंचनामा करून कारवाई केली जाईल,’ असे सिद्धमल यांनी स्पष्ट केले. ‘मात्र संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पाणी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी इवरे यांनी शेवटी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या : ४दुष्काळी भागातील ऊस, डाळिंब व इतर खरिपाच्या पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावेत. ४एकरी ८० टन ऊस उत्पादन गृहीत धरून एफआरपीप्रमाणे शासनाने पीक विमा व नैसर्गिक आपत्ती योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. ४डाळिंबासाठी एकरी ४ लाख रुपये उत्पादन गृहीत धरून ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत. ४शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत. ४नीरा उजवा कालवा समिती बरखास्त करावी. ४पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.