शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोटपाण्याचा व्यवसायही पाण्यात

By admin | Updated: December 10, 2015 01:00 IST

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा : मासेमारी,नौकाविहाराला अटकाव; अधिसूचनेत बदल करण्याची मागणी

मेढा : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना धरणात तापोळा, कांदाटी, सोळशी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या काही जणांना अजून त्याचा मोबदला मिळाला नाही की त्यांचे पुनर्वसन झाले नाही. जलाशयात हे शेतकरी मासेमारी, बोटिंग, हॉटेल व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजरान करीत आहेत. मात्र गृह विभागाच्या अधिसूचनेमुळे पोलीस प्रशासन या शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अ‍ॅड. महेश गोरे व शेतकऱ्यांनी या अधिसूचनेत बदल करावा अशा आशयाचे निवेदन दिले असून, त्या निवेदनात म्हटले आहे की, कोयना जलाशयात जावली, पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, काही शेतकरी, कुटुंबे, भूमिहीन झाली असून, त्यांना मोबदला मिळाला नाही. की त्यांचे पुनर्वसन झाले नाही. तापोळा, कांदाटी, सोळशी खोऱ्यातील असे शेतकरी उदरनिर्वाहासाठी नौकाविहार, मासेमारी, इकोटुरिझम व इतर पूरक व्यवसाय करीत आहेत.परंतु, कोयना धरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहविभागाने १९७२ साली एक अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेनुसार शिवसागर जलाशयात नौकाविहार व मासेमारीला पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जमिनी पाण्यात गेली उत्पन्नाचे दुसरे साधन नाही अशा परिस्थीतीत गृह विभागाच्या या अधिसूचनेमुळे या प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली असून, या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी या कोयना प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.नैसर्गिक साधन संपन्न व कोयना जलाशयावरच या खोऱ्यातील जनता अवलंबून आहे. वानवली गावचे सुपुत्र व लालबाग परळचे माजी आमदार दगडुदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारला असून, विदर्भ-मराठवाड्यासारखी इथल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी काही नियम व अटी शर्थीना अनुसरून गृहविभागाच्या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी मंत्रिस्तरावरही करण्यात येणार आहे.मिनी काश्मीर म्हणून ‘तापोळा’ समजले जाते नौकाविहारासाठी आणि निसर्गाचा आस्वाद लुटण्यासाठी जगभरातले पर्यटक पर्यटनासाठी तापोळा खोऱ्यात येतात. गृह विभागाच्या अधिसूचनेने पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात खीळ बसणार आहे. धरणाच्या भिंतीपासून दहा कि़ मी. पर्यंतचा परिसर निषिध्द करण्यात यावा व परिसराचा चतु:सिमासहीत नकाशा तयार करून धरणाला बाधा निर्माण होऊ नये यासाठी तज्ञांची मतेही विचारात घ्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.गृह विभागाच्या अधिसूचनेमुळे कोयना प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी केलेला त्याग लक्षात घेऊन या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी अ‍ॅड. महेश गोरे, आनंद सकपाळ, सचिव विशाल सकपाळ, दिनेश सकपाळ, ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण सकपाळ, विजय शेलार, गंगाराम सकपाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन केली आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ नको!नैसर्गिक साधन संपन्न व कोयना जलाशयावरच या खोऱ्यातील जनता अवलंबून आहे. वानवली गावचे सुपुत्र व लालबाग परळचे माजी आमदार दगडुदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारला असून, विदर्भ-मराठवाड्यासारखी इथल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी काही नियम व अटी शर्थीना अनुसरून गृहविभागाच्या अधिसूचनेत बदल करावा, अशी मागणी मंत्रिस्तरावरही करण्यात येणार आहे. या हालचाली वेगाने होवून या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.