शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बसथांबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

मल्हारपेठ : कऱ्हाड-नवारस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ ...

मल्हारपेठ : कऱ्हाड-नवारस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.

टपालपेट्या शोपीस

कऱ्हाड : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या टपालच्या पेट्यांची दुरवस्था झाली आहे. संबंधित विभागाकडून त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वर्षांपासून या टपाल पेट्यांमध्ये पत्रेच पडणे बंद झालेले आहे. मात्र, तरीही या बिकट परिस्थितीत पोस्ट आपली सेवा तग धरून आहे.

फुटपाथची दुरवस्था

कऱ्हाड : शहरातील दत्तचौक ते कृष्णा नाका या मार्गादरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या पादचारी मार्गावर ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून पादचाऱ्यांना यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

नेटवर्क गायब

सणबूर : बनपुरी परिसरात मोबाइलचे नेटवर्क गायब असून मोबाइल कंपनीचे टॉवर ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मोबाइलधारकांना रेंज मिळवण्यासाठी झाडांवर किंवा घरांच्या छतावर जावे लागत आहे. सध्या शिक्षणासह दैनंदिन कामातही इंटरनेटची गरज भासते. मात्र, या विभागात मोबाइलला रेंज नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

मार्गावर अतिक्रमण

कऱ्हाड : येथील दत्त चौक ते आझाद चौक परिसरातील रस्त्याकडेला किरकोळ दुकानदारांकडून व साहित्य विक्रेत्यांनी जाहिरात फलक ठेवून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पादचारी मार्गावर अस्ताव्यस्त फलक लावणाऱ्यांवर पालिकेकडून कडक कारवाई करणे गरजेचे आहे.