शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महामार्गावर टिच्चून एसटी बस उभीच!--परजिल्ह्यातील बसेसचे काय?

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

प्रशासन लागले कामाला खंडाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्या बसचालकांना सूचना

शिरवळ : पारगाव, ता. खंडाळा येथे महामार्गावर काल (रविवारी) झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महामार्गावर बस थांबवू नयेत, असे आदेश दिले. या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोवरच सोमवारी पुन्हा महामार्गावर बस थांबून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरूच होता.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव गावच्या हद्दीत एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांवर कंटेनर उलटून आठ जण ठार झाले. या घटनेनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार मंत्री पाटील, जिल्हाधिकारी मुदगल यांनी एसटी बसेस महामार्गावर न थांबविता बसस्थानक व अधिकृत बसथांब्यांवर थांबवाव्यात, असे आदेश दिले होते. मात्र, अपघाताच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एसटी प्रशासनाकडून आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून आले आहे.दरम्यान, महामार्गावर बसेस थांबू नयेत, यासाठी खंडाळा व शिरवळ पोलीस ठाण्यांच्या वतीने महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या एसटी बसेस व इतर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने आदेश दिले असले तरी एसटी महामंडळाकडून त्याचे पालन होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. (वार्ताहर)महामार्गावर कर्मचारी तैनातपारगाव येथे बसेस बसस्थानकात पाठविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. मात्र, शिरवळ येथे उलट परिस्थिती दिसून आली. याठिकाणी महामार्गावरच एसटी बसेस थांबताना दिसून येत होत्या. पोलीस कारवाई करत असले तरी त्यांनाही जुमानत नसल्याचे पाहायला मिळत होते. कंटेनरचालकाला न्यायालयीन कोठडीपारगाव, ता. खंडाळा येथील आठ प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आलल्या कंटेनरचालकाला खंडाळा न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. नवनाथ आजिनाथ गिते (वय २७, रा. पांगूळगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) असे कंटेनरचालकाचे नाव आहे.अनधिकृत थांबेमहामार्गावर शिंदेवाडी फाटा, लॉकिम फाटा, शिर्के कॉलनी फाटा, शिरवळ पोलीस दूरक्षेत्र कार्यालयासमोर, जगताप हॉस्पिटलसमोर, निप्रो कंपनी फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव शहीद जवान सुनील यादव कमानीसमोर, खंबाटकी घाटाजवळील जुना टोलनाका याठिकाणी अनधिकृत थांबे आहेत.परजिल्ह्यातील बसेसचे काय?पारगाव येथील अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने एसटी बसेस महामार्गावर न थांबविण्याचे आदेश दिले असले तरी कोल्हापूर, सांगली, परळ, मुंबई आदी जिल्ह्यातील आगारांतून येणाऱ्या बसेस प्रत्येक बसस्थानकात जात नाहीत. महामार्गावर थांबूनच प्रवाशांना घेत असल्याचे पाहायला मिळते.अपघातानंतर पोलिसांनी सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. अनेक वर्षांची सवय मोडणे हे जिकिरीचे काम आहे. त्यासाठी प्रवाशांनीही जागृत व्हावे. धोकादायक ठिकाणी थांबू नये.- अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, खंडाळामहामार्गावर व खंबाटकी घाटात धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. खंडाळ्याच्या उड्डाणपुलावरही प्रवाशांसाठी सूचना फलक लावण्याची व्यवस्था केली आहे. ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.- के. पी. मिरजकर, बांधकाम अभियंताप्रशासन लागले कामालाखंडाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्या बसचालकांना सूचनाखंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर पारगाव-खंडाळा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून महामार्गावर असणारे अनधिकृत बसथांबे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासून कामाला लागली होती.अपघात झालेल्या ठिकाणी सोमवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे वाहतूक चालूच होती. मात्र, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या हा प्रकार लक्षात येताच पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी महामार्गावर उभे राहून प्रवाशांना बसस्थानकाकडे जाण्याच्या सूचना केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्या महामार्गावरूनच जात असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय असल्याने सर्व पोलिसांनी सूचना देऊन बसेस बसस्थानकात पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाने केली.त्यामुळे सकाळपासून महामार्गावर दिसणारी गर्दी किमान आजच्या दिवशी तरी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. मात्र, एसटी महामंडळाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाहनचालकांना सूचना करण्यासाठी फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)पुण्याकडे जाणाऱ्या बस थेटउड्डाणपूल झाल्यापासून महामार्गावरच बसथांबा बनला आहे. कर्नाटक, कोल्हापूर, सांगली व अन्य ठिकाणांहून पुण्याकडे दिवसभरात पाचशेपेक्षा जास्त बसफेऱ्या होतात. पुण्याहून सातारकडे येणाऱ्या बस खंडाळा बसस्थानकात येतात. मात्र, पुण्याकडे जाणाऱ्या बसेस मात्र आजही थेट जातात. काल ज्या जागेवर मृत्यूचे तांडव झाले, त्या ठिकाणापासून थोडे पुढे बस उभ्या राहत होत्या.