शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

आरोग्य विम्याची बांधकाम कामगारांसाठी कवचकुंडले

By admin | Updated: September 7, 2014 23:17 IST

योजना पूर्ववत : कामगारांचा लढा यशस्वी

म्हाकवे : बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जीवनदायिनी असणारी आरोग्य विमा योजना गत महिनाभरापासून बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला होता. त्यामुळे राज्यातील हजारो कामगारांनी संघटित होऊन प्रशासनाशी लढा दिला. या लढ्याला यश आले असून, ही योजना पूर्ववत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक कामगाराच्या कुटुंबाची ‘कवचकुंडले’ आहेत. ती शासनाने हिरावून घेऊ नये, अशी भूमिका संघटनेने घेतल्याची माहितीही लाल बावटा कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. भरमा कांबळे आणि शिवाजी मगदूम-सिद्धनेर्लीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता दुसऱ्यांना निवाऱ्याची सोय करून देणारा बांधकाम मजूर मात्र बहुतांश वेळा दारिद्र्याचे जीवन जगत असतो; तर अनवधानाने या मजुराला अपघात झाला अथवा त्याला काही शारीरिक आजार उद्भवला तर त्यातून बरे होण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद नसते. त्यामुळे या मजुरासह त्याच्या कुटुंबाचीही आबाळ होण्याची शक्यता असते. याचा शासनस्तरावर विचार होऊन २५ जुलै २०१३ रोजी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान ठरणारी आरोग्य विमा योजना अमलात आणली. या योजनेतून बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्चाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, परंतु २५ जुलै २०१४ पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत राज्यातील हजारो कामगारांनी रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलने, निवेदनांच्या माध्यमातून ही योजना पूर्ववत करण्यास भाग पाडले. २२ आॅगस्ट पासून ही योजना पूर्ववत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सर्व कामगारांचे सहकार्य लाभल्याचेही संघटनेचे सचिव शिवाजी मगदूम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील ६०० कामगारांना लाभ! शासकीय बांधकामाच्या निधीतून एक टक्का निधी या कामगारांच्या आरोग्यासाठी खर्ची केला जातो. सध्या जिल्ह्यात ३९ हजार कामगारांची नोंद शासनदरबारी असून, या सर्वच कुटुंबांना या योजनांसाठी ‘कवचकुंडलांचे’ अभय मिळणार आहे. वर्षभरात सुमारे ६०० कामगारांच्या आरोग्य सुविधेसाठी शासनाचा सुमारे चार कोटी निधी खर्ची पडला आहे.